शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

आणीबाणीच्या कारणांची  योग्य मीमांसा होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:32 IST

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी का लादण्यात आली, हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे की यामागे अन्य कुठली कारणे आहेत, याबाबत योग्य मीमांसा करणे आवश्यक  असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी (दि. १४) ‘इंदिरा पर्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

नाशिक : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी का लादण्यात आली, हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे की यामागे अन्य कुठली कारणे आहेत, याबाबत योग्य मीमांसा करणे आवश्यक  असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी (दि. १४) ‘इंदिरा पर्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.  सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे आयोजित ग्रंथालय सप्ताहांतर्गत आयोजित व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी, आणीबाणी लादण्यावरून आपल्या देशात अनेक मत-मतांतरे असली तरीही ही आणीबाणी आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती तसेच देशांतर्गत स्थिती, युद्धाचा बोजा, दुष्काळ आदी कारणांमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केली असल्याचे सांगितले.  इंदिरा गांधी यांनी स्वीकारलेल्या धोरणाच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाºया परिस्थितीचे पदर, भौगोलिक परिस्थिती अवलंबून असल्याचे सांगितले. आणीबाणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला असला तरीही विरोधकांनी आणीबाणी तसेच विविध मुद्द्यांचा गैरवापर करून केलेला प्रचारामुळे झाला असल्याचे केतकर यांनी यावेळी सांगितले.  वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानादरम्यान व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत बगदे, वसंत खैरनार, शंकरराव बर्वे, बी. जी. वाघ उपस्थित होते.  भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी अमेरिका, रशिया, चीन आणि भारत यांचे आपापसातील संबंध त्याकाळी कसे होते, व्हिएतनाम युद्ध, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, बांगलादेशातील नागरिकांचे भारताकडे येण्याचे प्रमाण यांसह विविध राजकीय घटनांचा यावेळी उल्लेख केला.

टॅग्स :Nashikनाशिक