शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

आणीबाणीच्या कारणांची  योग्य मीमांसा होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:32 IST

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी का लादण्यात आली, हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे की यामागे अन्य कुठली कारणे आहेत, याबाबत योग्य मीमांसा करणे आवश्यक  असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी (दि. १४) ‘इंदिरा पर्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

नाशिक : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी का लादण्यात आली, हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे की यामागे अन्य कुठली कारणे आहेत, याबाबत योग्य मीमांसा करणे आवश्यक  असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी (दि. १४) ‘इंदिरा पर्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.  सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे आयोजित ग्रंथालय सप्ताहांतर्गत आयोजित व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी, आणीबाणी लादण्यावरून आपल्या देशात अनेक मत-मतांतरे असली तरीही ही आणीबाणी आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती तसेच देशांतर्गत स्थिती, युद्धाचा बोजा, दुष्काळ आदी कारणांमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केली असल्याचे सांगितले.  इंदिरा गांधी यांनी स्वीकारलेल्या धोरणाच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाºया परिस्थितीचे पदर, भौगोलिक परिस्थिती अवलंबून असल्याचे सांगितले. आणीबाणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला असला तरीही विरोधकांनी आणीबाणी तसेच विविध मुद्द्यांचा गैरवापर करून केलेला प्रचारामुळे झाला असल्याचे केतकर यांनी यावेळी सांगितले.  वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानादरम्यान व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत बगदे, वसंत खैरनार, शंकरराव बर्वे, बी. जी. वाघ उपस्थित होते.  भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी अमेरिका, रशिया, चीन आणि भारत यांचे आपापसातील संबंध त्याकाळी कसे होते, व्हिएतनाम युद्ध, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, बांगलादेशातील नागरिकांचे भारताकडे येण्याचे प्रमाण यांसह विविध राजकीय घटनांचा यावेळी उल्लेख केला.

टॅग्स :Nashikनाशिक