शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

आणीबाणीच्या कारणांची  योग्य मीमांसा होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:32 IST

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी का लादण्यात आली, हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे की यामागे अन्य कुठली कारणे आहेत, याबाबत योग्य मीमांसा करणे आवश्यक  असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी (दि. १४) ‘इंदिरा पर्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

नाशिक : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी का लादण्यात आली, हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे की यामागे अन्य कुठली कारणे आहेत, याबाबत योग्य मीमांसा करणे आवश्यक  असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी (दि. १४) ‘इंदिरा पर्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.  सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे आयोजित ग्रंथालय सप्ताहांतर्गत आयोजित व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी, आणीबाणी लादण्यावरून आपल्या देशात अनेक मत-मतांतरे असली तरीही ही आणीबाणी आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती तसेच देशांतर्गत स्थिती, युद्धाचा बोजा, दुष्काळ आदी कारणांमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केली असल्याचे सांगितले.  इंदिरा गांधी यांनी स्वीकारलेल्या धोरणाच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाºया परिस्थितीचे पदर, भौगोलिक परिस्थिती अवलंबून असल्याचे सांगितले. आणीबाणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला असला तरीही विरोधकांनी आणीबाणी तसेच विविध मुद्द्यांचा गैरवापर करून केलेला प्रचारामुळे झाला असल्याचे केतकर यांनी यावेळी सांगितले.  वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानादरम्यान व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत बगदे, वसंत खैरनार, शंकरराव बर्वे, बी. जी. वाघ उपस्थित होते.  भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी अमेरिका, रशिया, चीन आणि भारत यांचे आपापसातील संबंध त्याकाळी कसे होते, व्हिएतनाम युद्ध, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, बांगलादेशातील नागरिकांचे भारताकडे येण्याचे प्रमाण यांसह विविध राजकीय घटनांचा यावेळी उल्लेख केला.

टॅग्स :Nashikनाशिक