शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

आर्थिक सुधारांकरिता उच्चशिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक

By admin | Updated: December 22, 2015 23:01 IST

अभय टिळक : काकाणीनगर वाचनालय ग्रंथालय सप्ताह

मालेगाव : आर्थिक सुधारणांना आर्थिक पुनर्रचना म्हणजे जास्त संयुक्तीक असून या बदलांचा लाभ मिळवायचा असेल तर देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शासकीय यंत्रणेला अधिक सक्षम करणे आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी होईल याकरीता उपाययोजने आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थविश्लेषक आणि भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक अभय टिळक यांनी येथे केले. येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘आर्थिक सुधारणा: आजवरची वाटचाल आणि पुढील दिशा’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र अजय शाह होते.आर्थिक बदलांची संभावना उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण अशी करुन टाकल्यामुळे आणि आर्थिक बाबींबाबत लोकशिक्षण करण्याची राजकीय पक्षांची अनास्था व लोकांमध्ये असणारा अर्थसाक्षरतेचा आभाव यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदलांबद्दल अज्ञान आहे. याबद्दल खंत व्यक्त करुन टिळक यांनी हे बदलण्याकरीता अर्थतज्ञांनी लोकांपर्यंत अर्थशास्त्र लोकभाषेत नेण्याची, माध्यमे आणि शिक्षण व्यवस्थेने अर्थसाक्षरता वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.पंडित नेहरूजींच्या काळात नियोजन आयोगामार्फत राबविलेल्या गेलेल्या आर्थिक धोरणांमुळेच नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणा शक्य झाल्या. त्यामुळे त्या धोरणांवर टिका करणे चुकीचे आहे. उलट देशाचा आर्थिक पाया घडविण्याचे श्रेय त्यांचे आहे, असे मत अभय टिळक यांनी व्यक्त केले. भावना भडकविणे सोपे असते पण विचार घडविणे अवघड असते आणि वाचनसंस्कृती, व्याख्यानमाला या माध्यमांतून काकाणी वाचनालय हे विचार घडविण्याचे स्तुत्य कार्य करीत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी वाचनालयाबद्दल काढले. व्याख्यानास सर्व स्तरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.