शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

आर्थिक सुधारांकरिता उच्चशिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक

By admin | Updated: December 22, 2015 23:01 IST

अभय टिळक : काकाणीनगर वाचनालय ग्रंथालय सप्ताह

मालेगाव : आर्थिक सुधारणांना आर्थिक पुनर्रचना म्हणजे जास्त संयुक्तीक असून या बदलांचा लाभ मिळवायचा असेल तर देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शासकीय यंत्रणेला अधिक सक्षम करणे आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी होईल याकरीता उपाययोजने आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थविश्लेषक आणि भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक अभय टिळक यांनी येथे केले. येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘आर्थिक सुधारणा: आजवरची वाटचाल आणि पुढील दिशा’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र अजय शाह होते.आर्थिक बदलांची संभावना उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण अशी करुन टाकल्यामुळे आणि आर्थिक बाबींबाबत लोकशिक्षण करण्याची राजकीय पक्षांची अनास्था व लोकांमध्ये असणारा अर्थसाक्षरतेचा आभाव यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदलांबद्दल अज्ञान आहे. याबद्दल खंत व्यक्त करुन टिळक यांनी हे बदलण्याकरीता अर्थतज्ञांनी लोकांपर्यंत अर्थशास्त्र लोकभाषेत नेण्याची, माध्यमे आणि शिक्षण व्यवस्थेने अर्थसाक्षरता वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.पंडित नेहरूजींच्या काळात नियोजन आयोगामार्फत राबविलेल्या गेलेल्या आर्थिक धोरणांमुळेच नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणा शक्य झाल्या. त्यामुळे त्या धोरणांवर टिका करणे चुकीचे आहे. उलट देशाचा आर्थिक पाया घडविण्याचे श्रेय त्यांचे आहे, असे मत अभय टिळक यांनी व्यक्त केले. भावना भडकविणे सोपे असते पण विचार घडविणे अवघड असते आणि वाचनसंस्कृती, व्याख्यानमाला या माध्यमांतून काकाणी वाचनालय हे विचार घडविण्याचे स्तुत्य कार्य करीत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी वाचनालयाबद्दल काढले. व्याख्यानास सर्व स्तरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.