शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

विकासाचा मुद्दा दूर, आरोप-प्रत्यारोपांनीच गाजले मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:53 IST

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या राजकीय दिवाळीत कुणी फोडले सुतळी बॉम्ब, तर कुणी उडविल्या फुलबाज्या, नेत्यांच्या भाषणांची रंगत

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला.जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ते पाच ठिकाणी सभा घेत नेत्यांनी आपल्या भाषणात स्थानिक विकासाच्या मुद्द्यांऐवजी प्रतिस्पर्धी नेत्यांविरुद्ध आरोपांची आतषबाजी केली. काही नेत्यांनी व्यक्तिगत स्तरावर जात सुतळी बॉम्ब फोडले, तर काहींनी अगदीच फुलबाज्या उडविल्या.शरद पवार यांचे तेल लावलेले पहिलवान एकमेकांच्या विरोधात लढले व त्यांना सोडून गेले. त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. पवार यांची अवस्था शोलेतील जेलरसारखी झाली आहे. यंदा विरोधीपक्षच शिल्लक राहिलेला नाही. कॉँग्रेसच्या गेल्यावेळेइतक्या जागाही येणार नाहीत. पवार यांच्या पक्षाचे नाव राष्टÑवादी असूनही त्यांनी राष्टÑवादाच्या निर्णयाला विरोध दर्शविला. त्यांना स्वत:ला राष्टÑवादी म्हणवून घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.पाच वर्षांत आपल्या सरकारने आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक कामे केली असून, हिंमत असेल तर आघाडीने आपल्या पंधरा वर्षांतील कामाचा हिशेब द्यावा, आपण पाच वर्षांच्या कामाचा हिशेब देऊ.कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीचमग कलम ३७० सारख्या मुद्द्यांचा वापर केला जात आहे. पुलवामाच्या घटनेनंतरही हल्ला हा हवाई दलाने, सैन्याने केला. शौर्य सेनेने गाजविले, पण त्याचे श्रेय आपले पंतप्रधान घेतात. सत्ताधाऱ्यांनी कुठे श्रेयघ्यायचे, त्याचे तरी भान राखायलाहवे. प्रत्येक प्रश्नांवर ते फक्त कलम ३७० म्हणतात. रात्री झोपेतपण ३७० अशीच बडबड करत असतील का?अशी शंका येते.सुडाचे राजकारण करणे ही महाराष्टÑाची संस्कृती नाही. तुमच्या पापांचा घडा आता भरल्याने त्याची फळे भोगा. बाळासाहेबांवर गुन्हा दाखल करणे ही राष्टÑवादीची चूक होती, असे अजित पवार आता सांगतात. मग त्याच्यामागे असलेल्या नेत्याचे नाव का सांगत नाही, राज्यात युतीचेच सरकार येणार आहे कारण काँग्रेस व राष्ट्रवादी संपली आहे. एकटे शरद पवार ८० व्या वर्षी झुंज देत आहेत, हे कौतुकास्पद आहे. हा जोश जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखविला असता तर ही वेळच आली नसती.आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून गैरसमज पसरवित आहेत. आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागणार नाही.या देशात धमकीचे व दहशतीचे राजकारण सुरू झाले असून यामध्ये बदल करायचा असेल तर सत्ता परिवर्तन अपरिहार्य आहे. राहुल गांधी पुन्हा प्रचारात उतरले, ते उतरले की मोदीही उतरले. पाच वर्षांत भाजपने काय केले याची चिरफाड चालू असताना राहुल गांधी यांनी आल्या आल्या राफेलची जुनी टेप वाजवायला सुरूवात केली आहे. राफेलवर काँग्रेसला भाजपची कोंडी करायची असेल तर त्यांनी मैदानात मनमोहन सिंगांना उतरविले पाहिजे. भाजपला सत्तेवर ठेवण्याचे काम काँग्रेसच करीत आहे.सर्वच शेतकरी नेते हे प्रक्रि या उद्योगाचे मालक आहेत. त्यांच्या उद्योगाला कांदा व शेतमाल अल्पदरात उपलब्ध व्हावा यासाठी भाव पडले जात आहेत.महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत आहे. एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? सत्तेसाठी शिवसेना भाजपच्या पाठीमागे घरंगळत चालली असून, ही माणसे आहेत की गोट्या? कोठेही घरंगळून न जाणारा विरोधी पक्ष मला हवा आहे.मोदी सरकार आरसीईपी करारनामा करू पाहत आहे. त्यामुळे चीन, बांगलादेश, व्हिएतनाम येथून कापड आयात केले जाईल. सरकार हा करार करण्यात यशस्वी झाले तर देशाचे वस्त्रोद्योग क्षेत्र संपुष्टात येईल. कॉँग्रेस संपली असून, जगातील कुठलेही इंजेक्शन काँग्रेसला पूर्वावस्थेत आणू शकत नाही. मालेगाव शहरात स्वच्छतेअभावी क्षय रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शहरातील विकासाकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष झालेआहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर