शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

आठ वर्षांपासून रखडली जलसिंचन योजनेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:36 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संताप : योजनेत घोटाळा झाल्याचा संशय

तुकाराम रोकडेदेवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.सन २०१३-१४ साली मंजुरी मिळालेल्या देवगांव परिसरातील सामुंडी, खरोली, आळवंड, डहाळेवाडी, आव्हाटे, चंद्राची मेंट आणि देवगांव आदी गावांतील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसून, संबंधित योजनेची कामे बाळगली असून, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, बोजवारा उडालेल्या कामांचा ठेकेदारांनी बिल काढून काम पूर्ण दाखविल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलसंधारण प्रकल्पांतर्गत जलसिंचन योजनेचे २२ कोटी रुपयांची कामे सन २०१३-१४ साली मंजूर झाली होती. मात्र, आजतागायत कोणत्याही गावात काम पूर्ण न झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, देवगांव परिसरातील कामांचा आढावा दौरा करून अधिकाऱ्यांना जलसिंचनाची कामे तत्काळ पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले, तसेच ठेकेदारांची कानउघाडणी करून शेतकऱ्यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनल पाटील, उपकार्यकारी अभियंता सचिन धूम, संपत सकाळे, काँग्रेस नेते गोपाळ लहांगे, काँग्रेस युवक नेते निकलेश दोंदे, लक्ष्मण खाडे, सुनील बांगरे, आमदारांचे स्वीय सहायक जयराम मोंढे, चंद्राचीमेटचे सरपंच राजू चंद्रे, संतोष निरगुडे, ठेकेदार व शेतकरी उपस्थित होते.कोट...मागील नागपूरच्या अधिवेशनात सदर प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजना पूर्ण करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून दिरंगाई होत असलेल्या कामाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला केला, तसेच मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सदर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरजलसिंचनाची कामे मंजूर असलेली गावे...सामुंडी - ३ कोटी ( ७०% अपूर्ण)खरोली - ३.५ कोटी - (५५० एकर क्षेत्र)आळवंड - ३ कोटी (५०० एकर क्षेत्र )डहाळेवाडी - ३.५ कोटी (५०० एकर क्षेत्र)आव्हाटे - ३.१७ - कोटी (२१८ हेक्टर पैकी १०० एकर सिंचनाखाली)चंद्राचीमेट/ देवगांव - ६.५ कोटी (१,१०० एकर क्षेत्र) 

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत