शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

आठ वर्षांपासून रखडली जलसिंचन योजनेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:36 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संताप : योजनेत घोटाळा झाल्याचा संशय

तुकाराम रोकडेदेवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.सन २०१३-१४ साली मंजुरी मिळालेल्या देवगांव परिसरातील सामुंडी, खरोली, आळवंड, डहाळेवाडी, आव्हाटे, चंद्राची मेंट आणि देवगांव आदी गावांतील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसून, संबंधित योजनेची कामे बाळगली असून, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, बोजवारा उडालेल्या कामांचा ठेकेदारांनी बिल काढून काम पूर्ण दाखविल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलसंधारण प्रकल्पांतर्गत जलसिंचन योजनेचे २२ कोटी रुपयांची कामे सन २०१३-१४ साली मंजूर झाली होती. मात्र, आजतागायत कोणत्याही गावात काम पूर्ण न झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, देवगांव परिसरातील कामांचा आढावा दौरा करून अधिकाऱ्यांना जलसिंचनाची कामे तत्काळ पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले, तसेच ठेकेदारांची कानउघाडणी करून शेतकऱ्यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनल पाटील, उपकार्यकारी अभियंता सचिन धूम, संपत सकाळे, काँग्रेस नेते गोपाळ लहांगे, काँग्रेस युवक नेते निकलेश दोंदे, लक्ष्मण खाडे, सुनील बांगरे, आमदारांचे स्वीय सहायक जयराम मोंढे, चंद्राचीमेटचे सरपंच राजू चंद्रे, संतोष निरगुडे, ठेकेदार व शेतकरी उपस्थित होते.कोट...मागील नागपूरच्या अधिवेशनात सदर प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजना पूर्ण करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून दिरंगाई होत असलेल्या कामाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला केला, तसेच मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सदर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरजलसिंचनाची कामे मंजूर असलेली गावे...सामुंडी - ३ कोटी ( ७०% अपूर्ण)खरोली - ३.५ कोटी - (५५० एकर क्षेत्र)आळवंड - ३ कोटी (५०० एकर क्षेत्र )डहाळेवाडी - ३.५ कोटी (५०० एकर क्षेत्र)आव्हाटे - ३.१७ - कोटी (२१८ हेक्टर पैकी १०० एकर सिंचनाखाली)चंद्राचीमेट/ देवगांव - ६.५ कोटी (१,१०० एकर क्षेत्र) 

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत