शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट 

By दिनेश पाठक | Updated: July 2, 2024 10:39 IST

मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. 

दिनेश पाठक /नाशिक : पावसाळा सुरू हाेऊन एक महिना उलटला तरी वरूणराजा धो धो बरसलेला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जलसंकट अधिक तीव्र झाले आहे. मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये 2 जुलैअखेर केवळ ७.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेचा पाणीसाठा २२.५६ टक्के इतका होता. यंदा कडाक्याच्या उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन वेगात झाले असून १५ टक्के साठा मागील वर्षाच्या तुलनेने कमी झाला आहे. मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. 

जूनमध्ये झालेल्या अगदी  तुरळक पावसाने धरणांमधील पाणी साठ्यात कोणतीच वाढ झालेली नाही. हा पाऊस सर्वत्र मुसळधार झाला तर पाण्याचा प्रश्न थोडा सुटेल. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा १९.१७ टक्के आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पोलिस बंदोबस्तात पाणी साेडण्यात आले. पाणीसाठ्यावर आपला हक्क सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाण्याच्या कारणाने संघर्ष पेटला.मात्र तरी देखील गंगापूर धरणात केवळ पंधरा टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील भोजापूर, नागासाक्या, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, भावली, ओझरखेड, माणिकपुंज ही धरणे कोरडी पडली आहेत. सर्वात मोठ्या अशा गिरणा धरणातही केवळ नऊ टक्के पाणी असून नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील 180 गावेही या धरणावर अवलंबून आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांत अजूनही टॅंकरने पाणी पुरवठा केला जातोय.

टॅग्स :Nashikनाशिक