शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रामीण भागात कर्ज वसुलीसाठी खाजगी कंपन्यांचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:37 IST

नामपूर : ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने मजुरी करणाऱ्या कर्जदारांना कोरोनाबरोबर नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत प्रत्येकाची आर्थिक स्थिती बिघडल्याने खाजगी कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी कर्जदारास वेढीस धरू नये. कर्ज वसुली त्वरित न थांबविल्यास कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोको आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देछुपे खर्च आदी माथी मारून व्यापार सुरु असल्याच्या तक्रारी

नामपूर : ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने मजुरी करणाऱ्या कर्जदारांना कोरोनाबरोबर नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत प्रत्येकाची आर्थिक स्थिती बिघडल्याने खाजगी कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी कर्जदारास वेढीस धरू नये. कर्ज वसुली त्वरित न थांबविल्यास कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोको आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.नामपूर परिसरातील तसेच काटवन परिसरात गेल्या पाच वर्षांपासून कर्ज पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपन्यांनी छोटे व्यावसायिक, महिला आदींना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला आहे. व्याज तसेच छुपे खर्च आदी माथी मारून व्यापार सुरु असल्याच्या तक्रारी काही कर्जदारांनी केल्या आहे. मजुरी करणाऱ्या सामान्य नागरिकांचे हाल झाले. व्यवसाय, मजुरी बंद झाल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून कोरोनाशी लढा दिला. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, मात्र कर्ज घेतलेल्या खाजगी कंपन्या यात बचत गट, पतसंस्था, फायनांन्स कंपन्यांनी वसुलीचा धडाका सुरु केल्याने ग्रामीण भागात सर्व सामान्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्यांना खाजगी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था वसुलीच्या नावाखाली व्यापार करत आहेत. अशातून सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. कर्ज वसुली त्वरित थांबली पाहिजे. खाजगी अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांना सरकारने निर्देश देऊन वसुली थांबवावी.- सचिन अहिरराव, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.

टॅग्स :bankबँकSocialसामाजिक