शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

ओबीसींना हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव : ललितकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 01:12 IST

ओबीसीला मोठा इतिहात आहे, पण दुर्दैवाने याबाबतची जाणीव समाजाला नसल्याने आजवर ओबीसींना डावलण्यात आले आहे. ओबीसींची जणगणना केली जात नसल्याने ओबीसींची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळेच ओबीसी समाज हक्कापासून वंचित झाला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ओबीसी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितकुमार यांनी केले.

ठळक मुद्देअखिल भारतीय ओबीसी महासभा अधिवेशन

नाशिक : ओबीसीला मोठा इतिहात आहे, पण दुर्दैवाने याबाबतची जाणीव समाजाला नसल्याने आजवर ओबीसींना डावलण्यात आले आहे. ओबीसींची जणगणना केली जात नसल्याने ओबीसींची खरी संख्या समोर येत नाही. त्यामुळेच ओबीसी समाज हक्कापासून वंचित झाला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ओबीसी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितकुमार यांनी केले. अध्यक्षस्थानी महासभेचे राज्य अध्यक्ष ॲड. रघुनाथ महाले होते.

गंजमाळ येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्रावण देवरे, चंद्रपूर येथील ॲड. अंजली साळवे, स्टुडंट राइट्स असोसिएशनचे प्रा. उमेश कोरराम, शशिकांत धाडी, किशोर वैती, प्रेमलता साळी, सुधीर सुर्वे आदी उपस्थित होते.

 

यावेळी ललितकुमार म्हणाले, ओबीसी समाजाला इतिहासाची जाणीव नाही. वेगवेगळ्या पक्षात असलेल्यामुळे समाजाविषयीची आत्मियता सांभाळली जात नाही. अनेक विचारवंत आहेत, परंतु त्यांचा अभ्यास नाही, जनजागृती नाही त्यामुळेच समाजावरील हक्काविषयीची जनजागृती करण्यासाठी देशभर मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे ललितकुमार म्हणाले. ओबीसींनी आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. आपली संस्कृती आणि तिचे महत्त्व ओळखले तरच समाजाविषयी जागरूकता येईल याविषयीची जनजागरूकता होणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मंडल कमिशनच्या वेळीच ओबीसींची जनगणना होणे अपेक्षित होते. त्यामुळेच समाजाची खरी लोकसंख्या समोर येत नसल्याने न्याय हक्क मिळत नसल्याची खंत ललितकुमार यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अनेक मान्यवरांनीदेखील आपली भूमिका मांडली.

प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय पवार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य, चंद्रकांत सोनार, संजय बच्छाव, चंद्रकांत गायकवाड, शोभा देवरे, विद्या घायतड, गौरव वाघ आदींनी केले.

टॅग्स :NashikनाशिकOBC Reservationओबीसी आरक्षण