शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अपुरे मनुष्यबळ, त्यात कामाचा बोजा

By admin | Updated: June 22, 2017 00:27 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवस्था ‘आधीच अपुरे मनुष्यबळ, त्यात कामाचा बोजा,’ अशी झाली आहे.

श्याम बागुल । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या आतील मद्यविक्रीचे परवाने नूतनीकरण करण्यावर बंदी घातल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी येऊन पडलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवस्था ‘आधीच अपुरे मनुष्यबळ, त्यात कामाचा बोजा,’ अशी झाली आहे. जिल्ह्यातील मद्यनिर्मिती कारखाने, विक्रीची दुकाने, परमिट रूम, बिअर शॉपी व जोडीला वायनरी असे डझनभर परवाने तपासण्यासाठी जेमतेम मनुष्यबळ हाती असलेल्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा पडणारा बोझा पाहता, त्यांना दैनंदिन शासकीय कामकाज करणेही मुश्कील झाल्याने परिणामी या खात्याच्या कार्यक्षमताही मंदावली आहे.  नाशिक जिल्ह्याचा विस्तार पाहता कामकाजात सुसूत्री करणासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने सहा विभागांत जिल्ह्याची विभागणी केली असून, त्यातील प्रत्येक विभागासाठी फक्त एक उत्पादन शुल्क निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक निरीक्षकाच्या सहाय्यासाठी फक्त एक शिपाई देण्यात आलेला आहे, म्हणजेच एका विभागाला सहा जणांचे मनुष्यबळ असताना या सहा जणांकडे सरासरी तीन ते चार तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्या ज्या व्यवस्थापनांना म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ज्यांना परवाने अदा केले आहेत, त्या मद्यविक्रीच्या प्रत्येक दुकानाची, बिअर बार व परमिट रूम, बिअर शॉपी यांची दर तीन महिन्यांतून एकदा तपासणी करण्याची जबाबदारी या पथकाची असून, त्यात अवैध दारूची निर्मिती, त्याच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे कामही सोपविण्यात आले आहे. ग्रामसभेने केलेले दारूबंदीचे ठराव, मद्यविक्रीच्या विरोधात नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची खात्री करून त्यावर उचित कार्यवाही करण्याचे कामही याच पथकाच्या कर्तव्याचा भाग मानला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी अवैध मद्यविक्रीच्या विरोधातील मोहीम तीव्र करण्यासाठी ‘व्हॉट््स अ‍ॅप’च्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींचे सात दिवसांच्या आत निपटारा करण्याचे कायदेशीर बंधन उत्पादन शुल्क निरीक्षकांवर टाकण्यात आले असून, अशा तक्रारींची खातरजमा करण्यासाठी निरीक्षकांनी स्थळभेटी देणे सक्तीचे करण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार अवैध दारूविक्री व्यवसायाच्या विरोधात वेळोवेळी संयुक्तमोहीम राबविणाऱ्या पथकाला दैनंदिन शासकीय कामकाज करण्यासाठी वेळच शिल्लक राहत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  संपूर्ण राज्यातच राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे रिक्तपदांचा भार अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आलेला असताना, त्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरात असलेले मद्यविक्रीचे परवाने नूतनीकरण न करण्याच्या दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्य उत्पादन शुल्क खात्याची दमछाक होऊ लागली आहे. वरकरणी न्यायालयाच्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी करणे एवढेच काम उत्पादन शुल्क खात्याचे असल्याचे मानले जात असले तरी, साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून या खात्यातील झाडून सारे अधिकारी, कर्मचारी या कामातच गुंतले आहेत.पाच महिन्यांपासून नाही सुटीफेब्रुवारी महिन्यात सर्वाेच्च न्यायालयात राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीच्या दुकानांबाबत दाखल याचिकेची सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पाठीमागे कामांचा सपाटा लागला आहे. न्यायालयाचे वेळोवेळी येणारे निर्देश पाहता त्याची पूर्तता करण्यात गुंतलेल्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून हक्काची सुटी व रजाही मिळू शकलेली नाही. मनुष्यबळाची कमतरता असल्याकारणाने रिलिव्हरची सोय नाही व सर्व्हिस मॅन्युअलनुसार चोवीस तास कर्तव्यासाठी बांधले गेल्याने तक्रार करणेही गैर मानले गेले आहे. राष्ट्रीय व राज्य मार्गांना भेटी देणे, मद्य दुकानांचे अंतर मोजणे, त्यांचे परवाने तपासणे, न्यायालयाच्या निर्णयानंतर परवाने नूतनीकरण न करण्याची कार्यवाही करण्याबरोबरच संबंधित परवानाधारकाच्या ताब्यातील मद्यसाठा तपासून तो सील करण्याची कार्यवाही पहिल्या टप्प्यात पार पडली असली तरी, त्यानंतर न्यायालयानेच वीस हजारांपुढील लोकसंख्या असलेल्या गावांना सूट देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर कार्यवाही करण्यात आली व अखेरच्या टप्प्यात परवाने स्थलांतरासाठी नव्याने अर्ज दाखल झाल्याने त्याची पुढील कार्यवाहीचे मोठे संकट राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांवर येऊन ठेपले आहे.