शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शेतकरी आत्महत्या प्रकरणात असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 7:35 PM

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान मुरलीधर सरोदे (४५) या तरुण शेतकºयाने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका पोलीस निरीक्षक यांनी शेतकरी आत्महत्येच्या कारणाचा वेगवेगळा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकºयाचे कुटुंब मदतीपासून वंचित राहणार होते. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित या प्रकरणाची चौकशी करून फेरअहवाल सादर करण्याच्या सूचना येथील तहसीलदार ज्योती देवरे यांना दिल्या आहेत. तब्बल सव्वादोन महिन्यांनी शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाठविणाºया तलाठ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान सरोदे या तरुण शेतकºयाच्या नावावर ०.४७ आर क्षेत्र आहे. त्याने शेतीवर व हातउसने असे सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून सरोदे याने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येच्या वेगवेगळ्या कारणांचा शोध घेण्यात आला. तलाठी देशमुख यांनी २५ नोव्हेंबर २०१७ ला (तब्बल सव्वादोन महिने) उशिराने शेतकरी आत्महत्येचा अहवाल येथील तहसील कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेल्या शेतकरी आत्महत्येच्या अहवालात आत्महत्येच्या कारणांची तफावत आढळून आली. आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यास अडचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित येथील तहसीलदार देवरे यांना या प्रकरणाची चौकशी करून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार देवरे यांनी ५ जानेवारीला चौकटपाडे येथे आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत माहिती घेतली. देवरे यांनी संबंधितांना मदत करण्यात तत्परता दाखविली आहे. सरोदे यांची आर्थिक परिस्थिती व बोंडअळीच्या आक्रमणामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. सरोदे यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, दोन मुली, एक अपंग बहीण आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकारी असंवेदनशीलता दाखवित असतील तर मदतीची अपेक्षा कुणाकडून ठेवायची, असा सवाल उपस्थित झाला आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात १९ शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शासनाने शेतकºयांचे समुपदेशन करून त्यांची मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक