शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

शेतकरी आत्महत्या प्रकरणात असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:35 IST

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान मुरलीधर सरोदे (४५) या तरुण शेतकºयाने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका पोलीस निरीक्षक यांनी शेतकरी आत्महत्येच्या कारणाचा वेगवेगळा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकºयाचे कुटुंब मदतीपासून वंचित राहणार होते. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित या प्रकरणाची चौकशी करून फेरअहवाल सादर करण्याच्या सूचना येथील तहसीलदार ज्योती देवरे यांना दिल्या आहेत. तब्बल सव्वादोन महिन्यांनी शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाठविणाºया तलाठ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान सरोदे या तरुण शेतकºयाच्या नावावर ०.४७ आर क्षेत्र आहे. त्याने शेतीवर व हातउसने असे सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून सरोदे याने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येच्या वेगवेगळ्या कारणांचा शोध घेण्यात आला. तलाठी देशमुख यांनी २५ नोव्हेंबर २०१७ ला (तब्बल सव्वादोन महिने) उशिराने शेतकरी आत्महत्येचा अहवाल येथील तहसील कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेल्या शेतकरी आत्महत्येच्या अहवालात आत्महत्येच्या कारणांची तफावत आढळून आली. आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यास अडचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित येथील तहसीलदार देवरे यांना या प्रकरणाची चौकशी करून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार देवरे यांनी ५ जानेवारीला चौकटपाडे येथे आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत माहिती घेतली. देवरे यांनी संबंधितांना मदत करण्यात तत्परता दाखविली आहे. सरोदे यांची आर्थिक परिस्थिती व बोंडअळीच्या आक्रमणामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. सरोदे यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, दोन मुली, एक अपंग बहीण आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकारी असंवेदनशीलता दाखवित असतील तर मदतीची अपेक्षा कुणाकडून ठेवायची, असा सवाल उपस्थित झाला आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात १९ शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शासनाने शेतकºयांचे समुपदेशन करून त्यांची मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक