शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या प्रकरणात असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:35 IST

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मालेगाव : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून असंवेदनशीलता दाखविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान मुरलीधर सरोदे (४५) या तरुण शेतकºयाने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तालुका पोलीस निरीक्षक यांनी शेतकरी आत्महत्येच्या कारणाचा वेगवेगळा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकºयाचे कुटुंब मदतीपासून वंचित राहणार होते. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित या प्रकरणाची चौकशी करून फेरअहवाल सादर करण्याच्या सूचना येथील तहसीलदार ज्योती देवरे यांना दिल्या आहेत. तब्बल सव्वादोन महिन्यांनी शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाठविणाºया तलाठ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.तालुक्यातील चौकटपाडे येथील दयावान सरोदे या तरुण शेतकºयाच्या नावावर ०.४७ आर क्षेत्र आहे. त्याने शेतीवर व हातउसने असे सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून सरोदे याने गेल्या २५ आॅगस्ट २०१७ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येच्या वेगवेगळ्या कारणांचा शोध घेण्यात आला. तलाठी देशमुख यांनी २५ नोव्हेंबर २०१७ ला (तब्बल सव्वादोन महिने) उशिराने शेतकरी आत्महत्येचा अहवाल येथील तहसील कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेल्या शेतकरी आत्महत्येच्या अहवालात आत्महत्येच्या कारणांची तफावत आढळून आली. आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यास अडचण निर्माण झाली होती. जिल्हाधिकाºयांनी संवेदनशीलता दाखवित येथील तहसीलदार देवरे यांना या प्रकरणाची चौकशी करून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार देवरे यांनी ५ जानेवारीला चौकटपाडे येथे आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत माहिती घेतली. देवरे यांनी संबंधितांना मदत करण्यात तत्परता दाखविली आहे. सरोदे यांची आर्थिक परिस्थिती व बोंडअळीच्या आक्रमणामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. सरोदे यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, दोन मुली, एक अपंग बहीण आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणातही तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकारी असंवेदनशीलता दाखवित असतील तर मदतीची अपेक्षा कुणाकडून ठेवायची, असा सवाल उपस्थित झाला आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात १९ शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शासनाने शेतकºयांचे समुपदेशन करून त्यांची मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक