शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्री पेयजल योजनेची समितीमार्फत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:58 IST

मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्ह्यात ८३ कामांना मंजुरी देण्यात आलेली असताना त्यापैकी फक्त ४१ कामांच्याच निविदा काढण्यात आल्या, त्यातही एकाच कंपनीने सोळा कामांसाठी सहाय्य करण्याचा प्रकार संशयास्पद असून, अधिकाऱ्यांऐवजी खासगी ठेकेदाराकडूनच अंदाजपत्रक तयार करून घेतले जात असल्याने या कामांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिला आहे.

नाशिक : मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्ह्यात ८३ कामांना मंजुरी देण्यात आलेली असताना त्यापैकी फक्त ४१ कामांच्याच निविदा काढण्यात आल्या, त्यातही एकाच कंपनीने सोळा कामांसाठी सहाय्य करण्याचा प्रकार संशयास्पद असून, अधिकाऱ्यांऐवजी खासगी ठेकेदाराकडूनच अंदाजपत्रक तयार करून घेतले जात असल्याने या कामांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिला आहे.महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना राबविण्यासाठी ठेकेदार मिळत नसतील तर या योजनांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्थायी समितीच्या सभेत या विषयावर चर्चा झाली. जिल्ह्णात विक्रमी संख्येने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलस्वराज, भारत निर्माण योजना यांसारख्या योजनांवर कोट्यवधीरुपये खर्च करण्यात येऊनहीपाण्याचा प्रश्न का सुटला नाही अशी विचारणा आत्माराम कुंभार्डे यांनी केली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या सभेत माहिती मागविण्यात आली होती. परंतु ती मिळत नसल्याने पुन्हा स्मरण पत्र पाठविण्यात आल्याची तक्रार केली. सभा सुरू होण्यापूर्वी आज ही माहिती मिळत असल्याचे सांगून कुंभार्डे यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या संशयास्पद कारभाराची तक्रार केली. ८३ कामांना मंजुरी दिलेली असताना फक्त ४१ कामांच्याच निविदा का निघाल्या, अन्य निविदा का निघाल्या नाहीत अशी विचारणा करून खासगी व्यक्तींकडून या योजनेच्या कामांचे अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून, तेदेखील सारखेच आहेत शिवाय कामासाठी निविदादेखील प्रत्येकी तीन आल्या आहेत. एकाच संस्थेकडून सोळा कामांसाठी सहायक कसे केले जात आहे. हा सारा प्रकारच संशयास्पद असून, त्याची चौकशी केली जावी अशी मागणी केली. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी, सध्या दुष्काळी परिस्थितीत योजनेचे कामे सुरू असून, सर्व कामे बंद करून त्याची चौकशी करणे शक्य नाही. काही कामांविषयी तक्रारी असतील तर तसे पुरावे सादर करावेत, त्याची समितीमार्फत चौकशी केली जाईल असे निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीदेखील येत्या आठ दिवसांत या संदर्भात अहवाल तयार करून देण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले.चौकटमहिला बाल कल्याणची झाडाझडतीया बैठकीत महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझाडती घेण्यात आली. शासनाने अंगणवाड्या बांधण्यासाठी उपलब्ध करून दिलेला निधी परत का गेला अशी विचारणा करण्यात आली त्याचप्रमाणे गेल्या वर्षी व यंदाही समितीचा निधी का खर्च केला नाही अशा प्रश्नांची सरबत्ती सर्वांनीच महिला व बाल विकास अधिकारी मुंडे यांच्यावर केली. त्यावर त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु जर योजना राबविण्यासाठी ठेकेदार पुढेच येत नसेल तर त्याच त्या योजना कशासाठी अशी विचारणा करून अन्य जिल्हा परिषदांच्या योजनांची माहिती घेऊन आपल्याकडेही त्या राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. महिला व बाल कल्याण विभागाचा कारभार संशयास्पद असून, अधिकारी सहकार्य करीत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर महिला व बाल कल्याणसाठी योजना बदलून तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी