शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

परमार्थ साधण्यासाठी अभिनव आटा व रोटी बँक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 01:02 IST

कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक उपक्रमात समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना घरपोच ५ किलो आटा दिला जातो. त्यातून निम्मा आटा त्यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी ठेवून उर्वरीत आट्याच्या पोळ्या बनवून दिल्यास त्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी रोटी बँकच्या सामजिक कार्यकर्त्यांकडून पार पाडली जाते.

ठळक मुद्देकोरोना संकटग्रस्तांना मदत

नाशिक : कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक उपक्रमात समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना घरपोच ५ किलो आटा दिला जातो. त्यातून निम्मा आटा त्यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी ठेवून उर्वरीत आट्याच्या पोळ्या बनवून दिल्यास त्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी रोटी बँकच्या सामजिक कार्यकर्त्यांकडून पार पाडली जाते.नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या अभिनव रोटी बँकेच्या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. यात प्राचार्य प्रशांत पाटील, विजय बाविस्कर, कैलास पाटील, हेमंत राठी, हेमंत धात्रक, उमेश राठी, दिलीप भामरे, सचिन जोशी, संजय लोंढे, अजित पाटील, अरविंद महापात्रा, डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. अनिता नेहते, डॉ. भरत केळकर, डॉ. राजेंद्र कलाल, डॉ. उल्हास कुटे, नानासाहेब सोनवणे, मिलिंद जाधव, समीर रकटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. कोविडमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. तर हजारो कुटुंबांतील कर्त्या नागरिकांना महिना, दोन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत किंवा पगारात मोठी कपात होत असल्याने त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अशा नागरिकांनादेखील समाजासाठी काही योगदान देण्याची इच्छा असते. मात्र, परिस्थितीअभावी त्यांना तसे शक्य हाेत नाही. अशा कुटुंबियांनादेखील मदत होऊ शकेल, तसेच त्यांना समाजासाठी काही याेगदान दिल्याचेही समाधान लाभू शकेल, असा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न रोटी बँकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.  या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ९५४५४५३२३३ या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना ५ किलो आटा अर्थात गव्हाचे पीठ घरपोच दिले जाते. त्यातून निम्म्या पिठाचा त्यांनी कुटुंबासाठी वापर करुन उर्वरीत पिठाच्या शक्य तेवढ्या रोट्या करुन त्या गृह अलगीकरणामध्ये असलेल्या बाधित गरजूंना किंवा गरजूंना मोफत द्याव्यात, अशी रोटी बँकेमागील संकल्पना आहे.  

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या