शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

आततायीपणामुळेच निष्पाप जिवांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:18 IST

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देपूर्वसूचना देणाऱ्या फलकांची गरज : बुडून मृत्यूच्या घटनांत होतेय वाढ

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाची महामारी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतेही कार्यक्रम नाहीत, मोठे लग्न समारंभ नाहीत, सण-उत्सव-यात्रा नाहीत. बाहेर कुठे फिरायला जावे म्हणावे तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती.. टीव्ही-मोबाइलचाही कंटाळा आलाय..फारसा कामधंदा नाही..यामुळे युवावर्ग घरात थांबण्यापेक्षा जवळपास कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु या नैसर्गिक वातावरणात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे छोटी-मोठी धरणे, तलाव, तळी, नदीतील डोह, विहिरी सध्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. खरे तर शेतीसाठी पाण्याचे हे स्रोत गरजेचे आहेत पण मुलांच्या आततायीपणामुळे ते जीवघेणे ठरत आहेत. देवळा तालुक्यात गेल्या महिन्याभरात अशा चार व इतर तालुक्यांत अशा अनेक घटना घडल्याने यावर सारासार विचार करण्याची वेळ आली आहे.ज्या ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची जास्त शक्यता आहे किंवा यापूर्वी तशा घटना घडल्या आहेत. तिथे सावधगिरीचे फलक लावण्याची गरज आहे. यामुळे भविष्यात अशा घटना, धोके टळू शकतात. प्रत्येक आठवड्याला जिल्हाभरात बुडून मरणाऱ्यांची घटना काहीतरी सांगून जात असली तरी बोध घ्यायला कुणीच तयार होत नाही. पोहायला येत नसतांनाही पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते हे माहीत असूनही मित्रांच्या आग्रहाखातर हकनाक मरणाच्या दारात पोचणाऱ्यांची संख्या कमी नाही. बैलपोळा, गणेशमूर्ती विसर्जन, सहल अशा पार्श्वभूमीवर कितीतरी जीव बळी पडतात. नशीब बलवत्तर असले तर वेळेवर मदत मिळून जीवदान मिळू शकते, नाहीतर ते चार-पाच मिनिटं जीवनरेषा पुसण्यास पुरेसे ठरतात. या मृत्यूच्या सापळ्यात कोण केव्हा अडकेल हे सांगणे कठीण असले तरी सावधगिरीचा उपाय म्हणून तेथे पूर्वसूचना देणाऱ्या पाट्या व फलक लावण्याची खरी गरज आहे.चोरचावडी (दहीवड ता.देवळा) येथील धबधब्यात दोन युवकांचा बुडून मृत्यू, वाखारी (ता.देवळा) येथील विहिरीच्या पाण्यात बुडून सैनिकाचा शेवट, रामेश्वर धरणावरील घटना, कळवणजवळ गिरणा नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू, मालेगावजवळ गिरणा नदीत बुडणाऱ्याची वाढती संख्या.. अशा कितीतरी घटना पाहता याबाबत विचार करण्याची गरज आहे ---- जितेंद्र आहेर, विरोधी पक्षनेते, देवळा नगरपंचायतधबधबा असो की कोणतेही धरण-तलाव असो ...अशा ठिकाणी जागृतीपर फलक लावून धोक्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेतल्यास पुढील काळात अशा दुर्घटना घडणार नाहीत.- भारत कोठावदे, देवळा

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस