शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आततायीपणामुळेच निष्पाप जिवांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:18 IST

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देपूर्वसूचना देणाऱ्या फलकांची गरज : बुडून मृत्यूच्या घटनांत होतेय वाढ

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाची महामारी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतेही कार्यक्रम नाहीत, मोठे लग्न समारंभ नाहीत, सण-उत्सव-यात्रा नाहीत. बाहेर कुठे फिरायला जावे म्हणावे तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती.. टीव्ही-मोबाइलचाही कंटाळा आलाय..फारसा कामधंदा नाही..यामुळे युवावर्ग घरात थांबण्यापेक्षा जवळपास कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु या नैसर्गिक वातावरणात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे छोटी-मोठी धरणे, तलाव, तळी, नदीतील डोह, विहिरी सध्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. खरे तर शेतीसाठी पाण्याचे हे स्रोत गरजेचे आहेत पण मुलांच्या आततायीपणामुळे ते जीवघेणे ठरत आहेत. देवळा तालुक्यात गेल्या महिन्याभरात अशा चार व इतर तालुक्यांत अशा अनेक घटना घडल्याने यावर सारासार विचार करण्याची वेळ आली आहे.ज्या ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची जास्त शक्यता आहे किंवा यापूर्वी तशा घटना घडल्या आहेत. तिथे सावधगिरीचे फलक लावण्याची गरज आहे. यामुळे भविष्यात अशा घटना, धोके टळू शकतात. प्रत्येक आठवड्याला जिल्हाभरात बुडून मरणाऱ्यांची घटना काहीतरी सांगून जात असली तरी बोध घ्यायला कुणीच तयार होत नाही. पोहायला येत नसतांनाही पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते हे माहीत असूनही मित्रांच्या आग्रहाखातर हकनाक मरणाच्या दारात पोचणाऱ्यांची संख्या कमी नाही. बैलपोळा, गणेशमूर्ती विसर्जन, सहल अशा पार्श्वभूमीवर कितीतरी जीव बळी पडतात. नशीब बलवत्तर असले तर वेळेवर मदत मिळून जीवदान मिळू शकते, नाहीतर ते चार-पाच मिनिटं जीवनरेषा पुसण्यास पुरेसे ठरतात. या मृत्यूच्या सापळ्यात कोण केव्हा अडकेल हे सांगणे कठीण असले तरी सावधगिरीचा उपाय म्हणून तेथे पूर्वसूचना देणाऱ्या पाट्या व फलक लावण्याची खरी गरज आहे.चोरचावडी (दहीवड ता.देवळा) येथील धबधब्यात दोन युवकांचा बुडून मृत्यू, वाखारी (ता.देवळा) येथील विहिरीच्या पाण्यात बुडून सैनिकाचा शेवट, रामेश्वर धरणावरील घटना, कळवणजवळ गिरणा नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू, मालेगावजवळ गिरणा नदीत बुडणाऱ्याची वाढती संख्या.. अशा कितीतरी घटना पाहता याबाबत विचार करण्याची गरज आहे ---- जितेंद्र आहेर, विरोधी पक्षनेते, देवळा नगरपंचायतधबधबा असो की कोणतेही धरण-तलाव असो ...अशा ठिकाणी जागृतीपर फलक लावून धोक्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेतल्यास पुढील काळात अशा दुर्घटना घडणार नाहीत.- भारत कोठावदे, देवळा

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस