शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:53 IST

मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही.

पंचवटी : मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. संसारात सुख निर्माण व्हावे यासाठी आध्यात्मात आले पाहिजे. ज्याला अध्यात्म शिकायचे आहे त्याने साधक दीक्षा घ्यावी, असे मत अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन करताना केले.आशेवाडी जवळील जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ आश्रमात अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे समस्या मार्गदर्शन आणि प्रवचन दर्शन सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.साधक दीक्षेचे महत्त्व सांगताना ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. विज्ञान आणि ज्ञान यांची सांगड साधक दीक्षेत घातली जाते. त्यामुळे जीवन हे सुखकर होते. पुण्य वाढले की मोक्ष मिळतो असा आपला समज आहे. त्या कारणाने प्रत्येक जण पुण्य मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पुण्य समजून घेण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. साधक दीक्षा घेतल्यानंतर साधकाने काही पथ्य पाळावयाची आहेत. त्यात त्यांनी कोणालाही फसवायचे नाही, व्यसन करायचे नाही, खोटे बोलायचे नाही, मनातही कोणाबद्दल वाईट चिंतायचे पाहिजे नाही, असे ते शेवटी म्हणाले.नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर तसेच इतर जिल्ह्यातून भक्तांनी दर्शनासाठी तसेच समस्येवर मार्गदर्शन मिळावे यासाठी गर्दी केली होती. यावेळी ३१५ नवीन साधकांना स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनी साधक दीक्षा दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक