शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:53 IST

मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही.

पंचवटी : मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. संसारात सुख निर्माण व्हावे यासाठी आध्यात्मात आले पाहिजे. ज्याला अध्यात्म शिकायचे आहे त्याने साधक दीक्षा घ्यावी, असे मत अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन करताना केले.आशेवाडी जवळील जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ आश्रमात अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे समस्या मार्गदर्शन आणि प्रवचन दर्शन सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.साधक दीक्षेचे महत्त्व सांगताना ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. विज्ञान आणि ज्ञान यांची सांगड साधक दीक्षेत घातली जाते. त्यामुळे जीवन हे सुखकर होते. पुण्य वाढले की मोक्ष मिळतो असा आपला समज आहे. त्या कारणाने प्रत्येक जण पुण्य मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पुण्य समजून घेण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. साधक दीक्षा घेतल्यानंतर साधकाने काही पथ्य पाळावयाची आहेत. त्यात त्यांनी कोणालाही फसवायचे नाही, व्यसन करायचे नाही, खोटे बोलायचे नाही, मनातही कोणाबद्दल वाईट चिंतायचे पाहिजे नाही, असे ते शेवटी म्हणाले.नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर तसेच इतर जिल्ह्यातून भक्तांनी दर्शनासाठी तसेच समस्येवर मार्गदर्शन मिळावे यासाठी गर्दी केली होती. यावेळी ३१५ नवीन साधकांना स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनी साधक दीक्षा दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक