शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

मेअखेरपर्यंत माहिती पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:15 IST

आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिकांचे वाटप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशप्रक्रिया : टंकलेखन पूर्ण, मुद्रितशोधनाचे काम सुरू

नाशिक : आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिकांचे वाटप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.नाशिक महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २० एप्रिलपासून आॅनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती, तर १० मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते. यंदा मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही आॅनलाइन प्रक्रियेस अद्याप सुरुवात झालेली नसल्याने दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थी आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ९ मे रोजी रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली असली तरी अद्याप माहिती पुस्तिकेची प्रत्यक्ष छपाई सुरू झालेली नाही. आतापर्यंत केवळ टंकलेखन झाले असून, मुद्रितशोधनाची प्रक्रिया सुरू आहे. मुद्रितशोधन पूर्ण झाल्यावर तत्काळ सर्व पुस्तिकांची छपाई सुरू होणार असून, मे महिन्यांच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तिका पडतील, असा विश्वास नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केला आहे.विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजीगेल्यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून घेण्यात आला होता. शहरातील विविध शाळांना ४ मे रोजीच माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले होते, तर १० मेपासूून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांची विक्री सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालापूर्वी प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण करून निकालानंतर दुसरा भाग भरला होता. असे असतानाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुमारे १२ आॅक्टोबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेसाठी तयारी करता आली नाही. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा असताना अद्यापही प्रवेशप्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी उमटत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण