शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

नाशिक विभागात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:24 IST

कृषी खात्याने या संदर्भात आपला अहवाल शासनाला सादर केला असून, त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कापसाबरोबरच काढणीवर आलेल्या तुर, व हरभरा पिकावरही खराब हवामान तसेच अवकाळी पावसाने हल्ला चढविल्याने काही प्रमाणात या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देधुळ्यात सर्वाधिक नुकसान : तूर, हरभ-यावरही संकट कृषी खात्याला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

नाशिक : खराब हवामान व निकृष्ट औषध फवारणीमुळे नाशिक विभागात सरासरी ६० टक्क्याहून अधिक कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, शेतक-याच्या हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. विभागात सर्वाधिक कापुस पिकाला फटका धुळे व जळगाव जिल्ह्याला बसला असून, नाशिक जिल्ह्यातील ३९ टक्के कापुस पिकही बोंडअळीने बाधित झाले आहे.कृषी खात्याने या संदर्भात आपला अहवाल शासनाला सादर केला असून, त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कापसाबरोबरच काढणीवर आलेल्या तुर, व हरभरा पिकावरही खराब हवामान तसेच अवकाळी पावसाने हल्ला चढविल्याने काही प्रमाणात या पिकांना धोका निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यात कापुस लागवडीखाली ०.४६ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील १८ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापुस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच हरभरा पिकावर इगतपुरी तालुक्यात मर रोगाचा तर तूर पिकावर गावात शेंगमाशी व शेंगांचे नुकसान या किडी प्रादुर्भाव आढळून आला आहे. धुळे जिल्ह्यात २.०५ लाख हेक्टर क्षेत्र कापुस लागवडीखाली असून, तेथे संपुर्ण क्षेत्रावरील पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच तूर पिकावर एकूण सहा गावांमध्ये शेंगमाशी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.नंदुरबार जिल्ह्यात १.०२ लाख हेक्टर क्षेत्र कापुस लागवडीखाली असून, त्यातील ०.३६ लाख हेक्टर क्षेत्र म्हणजेच ३५ टक्के कापुस पिकाला कीडीने नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात ४.७६ लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे,त्यातील ३.८६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. विशेष म्हणजे कापूस काढणीच्या तयारीत असतानाच त्यावर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने यापुर्वीच कृषी खात्याला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक