शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

सह्या धड न करणाऱ्यांकडून कसा व्हावा शहर सुधार? नाशिक महापालिकेत बहुमतातून आलेली बेफिकिरी

By किरण अग्रवाल | Updated: December 13, 2020 01:46 IST

राजकारणातील गांभीर्य अलीकडे हरवत चालले आहे. गृहपाठ अगर अभ्यास न करता राजकारण करू पाहण्याची सवय याला कारणीभूत आहे. फाजिल आत्मविश्वास व अतिउत्साहाच्या भरात गांभीर्य न बाळगता राजकारण रेटू पाहिले जाते तेव्हा बहुमत असूनही नामुष्कीची वेळ ओढवल्याखेरीज राहत नाही. नाशिक महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीप्रसंगी तेच झालेले आढळून यावे, हे शोचनीय आहे. स्थगित झालेल्या निवडी पुन्हा पार पडून वेळ निभावून जाईलही; पण पक्ष सदस्यांमधील बेफिकिरीच्या या अनुभवातून धडा घेतला गेला नाही तर ते विरोधकांसाठी सोयीचे ठरेल, हे नक्की.

ठळक मुद्देपक्षांतर्गत असमन्वय वेळोवेळी उघड...गांभीर्याच्या अभावातूनच झालेली गफलत आहे.चुकणाऱ्याला जाब विचारणारा कुणी राहिला नाही.

सारांशभाजपकडे स्पष्ट बहुमत असलेल्या नाशिक महापालिकेतील चारही विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवडणूक बिनविरोध होण्यासारखी स्थिती असताना त्यातील दोन स्थगित करण्याची वेळ पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यावर आली, ही बहुमत असलेल्या सत्ताधाऱ्यांचीच नामुष्की म्हणायला हवी. विरोधकांच्या अडचणीमुळे नव्हे, तर स्वपक्षातील गांभीर्याच्या अभावामुळे हे घडून आले.सदर गांभीर्याचा अभाव तरी काय व किती, तर साध्या सूचक, अनुमोदक यांच्या सह्या उमेदवारीसाठीच्या अर्जांवर नीट केल्या गेल्या नाहीत किंवा जुळल्या नाहीत म्हणून दोन निवडी स्थगित करण्याची वेळ आली, याला काय म्हणायचे? अभ्यासोनी प्रकटावे, या उपदेशाला राजकारणात अर्थ नाही हे खरे; पण इतका बेफिकीरपणा की सह्या नीट करता येऊ नयेत? यात राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून जाणीवपूर्वक समोरच्याचा अर्ज बाद करण्यासाठी अशी खेळी केली जात असते; परंतु जेथे भाजपचेच बहुमत आहे व भाजपच्या उमेदवारासाठी त्याच पक्षाचे सूचक-अनुमोदक आहेत; त्यांच्याकडूनही असे घडून यावे, यात व्यूहरचनेचा भाग नक्कीच असू शकत नाही, ही गांभीर्याच्या अभावातूनच झालेली गफलत आहे.विशेष म्हणजे, शहर सुधार समितीच्या सभापतिपदाबाबतही असेच घडून आल्याने स्वतःच्या सह्यांची जाण नसणाऱ्यांकडून शहराच्या सुधारणांची कसली अपेक्षा करता यावी, हा प्रश्नच उपस्थित व्हावा. बहुमत आपल्याकडे आहे म्हणजे बाकी कसल्या गोष्टीची चिंता करण्याचे कारण नाही, या राजकीय उर्मटतेतून ही नामुष्की भाजपवर ओढवल्याचे स्पष्ट आहे. कसलीही पूर्वतयारी करून सत्ताधारी पक्ष निवडणुकीला सामोरा जाऊ शकला नाही, हा यातील अधोरेखित होऊन गेलेला मुद्दा आहे. यातही स्वपक्षाच्या सभापतींना सत्कार व शुभेच्छादाखल द्यावयास आणलेला पुष्पगुच्छ ऐनवेळी महापौर सतीश कुलकर्णी यांना विरोधी शिवसेनेच्या एका नवनियुक्त उपसभापतीला देऊन काढता पाय घेण्याची वेळ आली, ही भाजपसाठी अधिक बोचरी व वेदनादायी नामुष्की ठरावी.का घडले असावे असे, याचा माग घेतला असता, एकच कारण समोर यावे ते म्हणजे या पक्षातील स्थानिक पातळीवरील वाढते निर्नायकत्व; जे यापूर्वीही अनेकदा उघड होऊन गेले आहे. कुणाचा कुणाला पायपोस उरला नाही, की चुकणाऱ्याला जाब विचारणारा कुणी राहिला नाही. सारेच आपल्या मनाचे मालक व कारभारी झाल्यासारखे वावरत असतात. पूर्वी महापालिकेच्या महासभा व्हायच्या तर त्याआधी पक्ष स्तरावर कोणता विषय कोणी व कसा लावून धरायचा, याबद्दल बैठका होऊन त्यात निर्णय व्हायचे. आता तसेही काही होताना दिसत नाही, त्यामुळे कधीकधी काही विषयांवर पक्षाच्याच सदस्यांकडून पक्षाचे पदाधिकारी अडचणीत सापडलेले दिसून येतात. त्यामुळे पारंपरिक ह्ययुतीह्णमध्ये वितुष्ट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीचा लाभ पालिकेतील विरोधी शिवसेनेने बऱ्यापैकी उचलल्याचे बघावयास मिळाले. हीच स्थिती यापुढेही कायम राहिल्यास आगामी महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याखेरीज राहणार नाही. प्रश्न आजच्या विषय समित्यांच्या निवडीचाच नसून, या फटक्याचा आहे, याची जाण भाजपला कधी येणार, हा खरा प्रश्न आहे.पक्षांतर्गत असमन्वय वेळोवेळी उघड...गोदावरी नदीवर पूल बांधण्याचा विषय असो, की भाभानगरमध्ये महिला रुग्णालय उभारण्याचा मुद्दा; पेस्ट कंट्रोलचा ठेका असो, की अन्य काही; भाजपच्या सदस्यांमध्ये परस्परांत मतभिन्नता आढळून आल्याने पदाधिकाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागलेले बघावयास मिळाले. मागे नाशिक रोडमधील वाचनालयाच्या आरक्षण बदलावरून स्वकीयांनीच आपल्या पदाधिकाऱ्यांची थेट नार्को टेस्ट करण्याची मागणी केलेली पहावयास मिळाली. सत्ताधाऱ्यांमधील हा अंतर्विरोध व आनंदी-आनंदच त्यांच्या व पक्षाच्याही अच्छे दिनसाठी बाधक ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाsatish kulkarniसतीश कुलकर्णीSuraj Mandhareसुरज मांढरेElectionनिवडणूकBJPभाजपा