शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सरपंचपदांचे आरक्षण जानेवारीत काढण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 14:28 IST

घोटी : नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०१५ ला काढलेले आरक्षण मार्च २०२० ला समाप्त होत आहे. त्यानुसार तालुकानिहाय ग्रामपंचायतींच्या आरक्षणाबाबत लवकरच आरक्षण प्रक्रि या काढण्याचे संकेत मिळाले आहेत.

घोटी : नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०१५ ला काढलेले आरक्षण मार्च २०२० ला समाप्त होत आहे. त्यानुसार तालुकानिहाय ग्रामपंचायतींच्या आरक्षणाबाबत लवकरच आरक्षण प्रक्रि या काढण्याचे संकेत मिळाले आहेत. १ एप्रिलपासून सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये नवे आरक्षण लागू करायचे असल्याने तत्पूर्वी नव्या आरक्षणाची प्रक्रि या राबवली जाणार आहे. तालुकास्तरावर महिलांचे आरक्षण काढण्याचे अधिकार नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. पाच वर्षात बदललेल्या आरक्षणामुळे गैरसोय झालेल्या ग्रामीण राजकीय पदाधिकाऱ्यांना बदलणाºया आरक्षणाचे डोहाळे लागलेले आहेत.नाशिक जिल्ह्यातील बिगर अनुसूचित, अंशत: अनुसूचित, पूर्णत: अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गाच्या सरपंच पदांसाठी जानेवारी २०२० ला आरक्षण काढण्यात येईल. मात्र यामध्ये महिलांसाठी आरक्षण काढले जाणार नसून जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकाºयांच्या देखरेखीखाली महिलांच्या सरपंचपदासाठी ग्रामपंचायती सोडत पद्धतीने आरक्षित केल्या जातील. २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी आरक्षण काढतांना यापूर्वी दिलेले आरक्षण वगळण्यात येईल. जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर हे तालुके संपूर्णत: अनुसूचित क्षेत्रात असल्याने या तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद आदिवासींसाठी कायमचे आरक्षित आहेत. या तालुक्यांत फक्त आदिवासींपैकी महिला की पुरु ष आरक्षण द्यायचे ह्याबाबत निर्णय घेतला जाईल. २०१५ मध्ये ज्या ग्रामपंचायतींना महिला आरक्षण दिले होते, त्या ग्रामपंचायती वगळून अन्य ठिकाणी महिलांच्या आरक्षणाचा विचार होऊन इतर ठिकाणी पुरु षांची वर्णी लागू शकेल. अंशत: अनुसूचित क्षेत्रात असणारे देवळा, दिंडोरी, इगतपुरी, बागलाण, नाशिक हे पाच तालुके आहेत. तर बिगर अनुसूचित क्षेत्रात मालेगाव, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला, सिन्नर हे सहा तालुके आहेत. या सहा तालुक्यांसह अंशत: अनुसूचित क्षेत्रातील पाच तालुक्यातील बिगर आदिवासी भागात सरपंच पदासाठी नेहमीच मोठी चुरस असते. १ एप्रिल २०२० पासून होणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी नवे आरक्षण लागू करावे लागणार आहे. म्हणून निवडणुकांपूर्वीच आरक्षण प्रक्रि या करण्यासाठी प्रशासनाला काम करावे लागणार आहे.आरक्षण काढतांना ग्रामपंचायतींना यापूर्वी दिलेले आरक्षण वगळण्यात येणार आहे तर २०१५ मध्ये महिलांना आरक्षण दिलेल्या ग्रामपंचायती वगळून इतर ग्रामपंचायती महिलांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने आरिक्षत केल्या जातील. मात्र तालुकास्तरावरील आरक्षण काढल्यावरच जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल.

टॅग्स :Nashikनाशिक