शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा : राज ठाकरे

By admin | Updated: August 5, 2016 02:10 IST

वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा : राज ठाकरे

 नाशिक : विधिमंडळात विरोधकांनी इतर विषयांना हात घालू नये, म्हणून स्वतंत्र विदर्भाची आरोळी ठोकायची आणि लक्ष दुसरीकडे वळवायचे, हाच भाजपाचा उद्योग सुरू आहे. वेळकाढूपणासाठीच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीकास्त्र सोडले. मनसेची भूमिका अखंड महाराष्ट्राचीच असल्याचा पुनरुच्चारही राज यांनी यावेळी बोलताना केला.दोन दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर भाष्य केले. राज यांनी सांगितले, राज्यात इतरही अनेक महत्त्वाचे विषय समोर असताना आणि शिक्षण, आरोग्य यामध्ये गोंधळाची स्थिती असताना विधानसभेत या विषयांवर चर्चा होण्याऐवजी वेळकाढूपणासाठी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. राज्यात भाजपाच्या हाती सत्ता आहे. तर मग विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी आणि विकासासाठी यांना थांबविले कुणी? विरोधकांनी इतर विषयांवर चर्चा करू नये म्हणून गेल्या तीन दिवसांपासून हा सारा गोंधळ सुरू आहे. भाजपा माध्यमांना आणि जनतेलाही खेळवत आहे. न केलेल्या कामांवर चर्चा होऊ नये यासाठी लक्ष वळविण्याचा प्रकार सुरू आहे. विदर्भाला सवलती दिल्या जात आहेत तर मग बोंब कशाला मारतात, असा सवालही राज यांनी केला. कॉँग्रेसही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने बोलू लागली आहे. ही सारी मिलिभगत असल्याचा आरोप राज यांनी केला. मुख्यमंत्री अजूनही विरोधी पक्षातून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे ते रोज स्वत:ला आपण मुख्यमंत्री आहोत किंवा नाही हे पाहण्यासाठी चिमटे काढत असतात, असा टोलाही राज यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.