शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

By admin | Updated: November 12, 2016 22:40 IST

अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

गिरीश जोशी  मनमाडमनमाड पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू पाहात आहेत. उपद्रव मूल्य ठरणाऱ्या अपक्ष उमेदवारांची मनधरणी करून त्यांनी या ना त्या प्रकारे आपल्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात मनमाड येथे सर्वाधिक १६२ उमेदवार रिंगणात असून, यामध्ये ५८ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवित आहेत.विविध उद्दिष्ट्य डोळ्यांसमोर ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हौशा, नवशा गवशा उमेदवारांमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. यात पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. परंतु हे बंडखोर त्या त्या पक्षासाठी अडचणीचे ठरत आहेत. माघारीच्या दिवशी ५९ अपक्षांनी माघार घेतली असली तरी तब्बल ५८ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काही अपवादात्मक प्रबळ असे अपक्ष उमेदवार आहेत. ते सोडता काही उमेदवारांचे उद्दिष्ट वेगळे असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी माघार घेताना काही अपक्ष उमेदवारांनी मी या प्रभागातून उमेदवारी केली होती मात्र मी माघार घेऊन अमुक उमेदवाराला पाठिंबा देत असल्याची भूमिका घेतली आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी वातावरण तापू लागले असून, महायुती व आघाडी न झाल्याने शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर होणाचे चित्र आहे. त्यामुळे बसपा व एमआयएमआयएम या पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत चांगलेच रंग भरले आहेत.निवडणुकीसाठी १६२ उमेदवार रिंगणात असून, यात तब्बल ५८ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अपक्षांची मोठी संख्या पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरू पाहात आहे. निवडणुकीच्या रिंगणात महिलासुद्धा मागे नसून, एकूण ८४ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १४ अ व १४ ब मध्ये सर्वाधिक प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागात अपक्षांची संख्या अधिक आहे. दोन्ही प्रभागात प्रत्येकी ६ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवारांमध्ये काही प्रबळ उमेदवार असले तरी प्रभागपद्धतीच्या निवडणुकीमुळे त्यांना अडचण निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अपक्ष अर्जामुळे बंडखोरीचा वनवा सर्वच पक्षांना लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाने उमेदवारी नाकारलेले नाराज तसेच अपक्ष उमेदवारांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ अशा अविर्भावात निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. पराभव झाला तरी हरकत नाही पण आता माघार नाही या इर्षेने अनेक उमेदवार पेटून उठले आहेत. या उपद्रव मूल्य ठरलेल्या उमेदवारांची मनधरणी करून त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.