शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात सुपर स्प्रेडर्सचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST

मनमाड शहरात सध्या ३८ तर नांदगाव शहरात ८३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात सरासरी ५०० ते ७५० दरम्यान पॉझिटिव्ह ...

मनमाड शहरात सध्या ३८ तर नांदगाव शहरात ८३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात सरासरी ५०० ते ७५० दरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण होते. मात्र, दोन्ही ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या. त्यामुळे प्राथमिक लक्षणे दिसत असताना उपचार सुरू झाले. त्या सर्वांना लक्षणानुसार संस्थात्मक विलगीकरण व हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने अल्पावधीत कोरोनाचा प्रसार मर्यादेत आला. दरम्यान, शासनाने कडक निर्बंधांचे नियम काही प्रमाणात कडक केले. परंतु, प्रभावी अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याचे चित्र आहे. व्यावसायिक प्रतिष्ठाने व दुकाने दिलेल्या वेळेचे पालन नीट करत नसल्याने रस्त्यावर ग्राहकांच्या गर्दीत ‘रिकामे’ फिरणारे घोळक्यांत भर घालताना आढळून येतात. अनेक दुकानदार रस्त्यावर त्यांचे टेहळे ठेवतात. अंमलबजावणी पथक येताना दिसले की, ग्राहकांना आत घेऊन ताबडतोब शटर खाली करून बंद असल्याचा भास निर्माण केला जातो. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे त्याकडे साेयीस्कर दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

इन्फो

मूळडोंगरीत रुग्णसंख्येत घट

मूळडोंगरी येथे मागच्या महिन्यात १०२ कोरोनाबाधित रुग्ण होते. आज तिथे फक्त पाच पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पाॅझिटिव्ह निघाला की, शाळेतच पाठवायचे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता आले. सावरगावच्या ग्रामस्थांनी पाहुणा आला की थेट शाळेतच पाठवायचा, हे धोरण राबविले. मात्र असे सगळ्या गावांत घडत नाही. त्यामुळे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी दिले आहेत.

इन्फो

बाधिताचा दर २३ टक्के

आरोग्य विभागामार्फत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात ५०६५ आरटीपीसीआर टेस्ट व ४३१९ ॲटीजेन टेस्ट करण्यात आल्या. एकूण ९३८४ त्यापैकी २१८० नमुने पॉझिटिव्ह आले. हा दर २३ टक्के आहे. तो १५ टक्क्यापर्यंत खाली आणणे गरजेचे आहे.

कोट....

ग्रामीण भागात अद्याप २७८ रुग्ण आहेत. टेस्टिंग वाढवले तर ही संख्या दुप्पट दिसू शकते. संस्थात्मक विलगीकरणासाठी लोक जाण्यास तयार होत नाहीत. घरीच विलगीकरणात राहू असा आग्रह धरतात. ग्रामीण भागात घरातले अंतर कमी असते. एकच शौचालय कुटुंबातले सगळे सदस्य वापरतात. त्यामुळे एकाकडून इतरजण बाधित होतात आणि कोरोनाची साखळी वाढत जाते. जि.प.च्या शाळा विलगीकरणासाठी प्रमाणित केल्या आहेत. मात्र, बाधित त्याठिकाणी जाऊन राहत नाहीत.

-डॉ. अशोक ससाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी