शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मधुमेह आजाराचे वाढते प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: November 14, 2016 01:26 IST

७० ते ८० टक्के प्रमाण : संतुलित आहार आणि व्यायामाने नियंत्रण शक्य

नामदेव भोर नाशिकडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक प्रसन्नता या चतु:सूत्रीच्या आधारे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यासह आहार तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असून, संतुलित आहार घेतल्यास ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्त करतात. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि बदलती खाद्यसंस्कृती यामुळे मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, देशातील मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम खाद्यपदार्थांवर होतो. त्यामुळे उघड्यावर उभ्याने खाल्लेल्या पदार्थांचा दुष्परिणाम आरोग्यावर निश्चितच होत असतो. अशा अन्नपदार्थांमधील दोषातून शारीरिक रोग निर्माण होतात. आहारात पथ्ये पाळल्यास उष्णता कमी होते. वेगवेगळ्या वनस्पतींचे मिश्रण केलेली उटणी, आयुर्वेदिक धूप हे मधुमेह नियंत्रणावरील प्रभावी उपाय आहेत. पचन व्यवस्था, हृदयविकार, मूत्रपिंड अशा वेगवेगळ्या संस्थांवर मधुमेहाचा दुष्परिणाम होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. स्त्रियांच्या मानसिकतेचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे मन प्रसन्न ठेवले पाहिजे. आपल्या प्रकृतीनुसार आहार निश्चित करणे आवश्यक आहे, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.