शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

वाढत्या भारनियमनाने बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:09 IST

नायगाव : वाढते भारनियमन व सततचा रोहित्रांचा बिघाड यामुळे पाणी असुनही पिकांना वेळेत पाणी देणे शेतक-यांसाठी अवघड होऊन बसले आहे.

नायगाव : वाढते भारनियमन व सततचा रोहित्रांचा बिघाड यामुळे पाणी असुनही पिकांना वेळेत पाणी देणे शेतक-यांसाठी अवघड होऊन बसले आहे. शेतकरी वावरात रात्रीचा दिवस करून जिवाची पर्वा न करता पिके वाचविण्यासाठी बळीराजाचा सध्या शेतात ‘रात्रीस खेळ चाले’ प्रमाणे पाणी देण्याचा दिनक्र म सुरू झाला आहे.गेल्या अनेक वर्षानंतर यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेता आला आहे.सध्या नायगाव खो-यात रब्बी हंगामातील कांदा, गव्हु, टमाटे, कोबी, फ्लावर आदींसह विविध पिके जोमात आहे. मात्र ऐन मोसमात आलेल्या पिकांना वीज वितरण कंपनीच्या वाढत्या भारनियमन, रोहित्रांचा खोळंबा तसेच भारनियमनाचे नियोजन शुन्य कारभारामुळे विहीरीत पाणी असतांनाही शेतातील पिके पाण्याअभावी करपण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीच्या वाढत्या भरनियमन व रोहित्रांची नादुरूस्तीमुळे शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे.नायगाव परिसरातील सर्वच गावांमध्ये दिवसा आठ तास तर रात्री दहा तास थ्री फेजचा वीज पुरवठा केला जातो . त्यातही दिवसाच्या वेळेत अचानक अतिरिक्त भारनियमन तसेच रोहित्र बिघाडाचे खोळंब्यामुळे पाणी उपलब्ध असतांनाही पिकांना देता येत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. सध्या वातावरणात थंडी बरोबरच उन्हाची तीव्रताही वाढली आहे.त्यामुळे पिकांना वेळेत पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा परिसस्थतीत शेतकरी रात्रीच्या वेळेत असणाºया थ्री फेज वीज पुरवठ्याच्या वेळेत पाणी भरण्याला पसंती देत आहे. पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी देणाºयाशेतक-यांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.शिवारातील सर्वच कानाकोप-यात रात्रीच्या वेळी शेतक-यांचा शांत वातावरणात बोलण्याचा आवाज ब-याच अंतरावर ऐकू येत आहे.वाढत्या थंडी बरोवरच परिसरात बिबट्यांचा वाढता संचार असतांना आपला जीव मुठीत धरून शेतकरी पिके वाचिवण्यासाठी रात्रीचा दिवस करून पिकांना वेळेत पाणी देण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.आज पर्यंत शेतकरी शेतात दिवसभर कष्ट करून रात्रीच्या वेळेत विश्रांतीसाठी घराकडे परतायचा सध्या मात्र भारिनयमणामुळे शेतातील पिकांसाठी ‘रात्रीस खेळ चाले’ अशी गत झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक