शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
3
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
4
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
5
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
6
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
7
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
8
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
9
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
10
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
11
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
12
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
13
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
14
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
15
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
16
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
17
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
18
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
19
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
20
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन

वणी येथे वाढीव पाणीपुरवठ्याचे काम प्रगतिपथावर

By admin | Updated: December 8, 2015 23:51 IST

वणी येथे वाढीव पाणीपुरवठ्याचे काम प्रगतिपथावर

वणी : शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीबरोबर ग्रामपालिका स्तरावरही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हे काम प्रगतिपथावर असले तरी ते लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सन २००७-०८ साली दोन कोटी ८० लाख रु पयांच्या अंदाजपत्रकाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. आदिवासी उपयोजनेतून मंत्रालय स्तरावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा समितीकडे ठेकेदाराच्या माध्यमातून ही जबाबदारी सोपविण्यात आली; मात्र निधीच्या उपलब्धतेनुसार पाच किलोमीटर नऊशे मीटर अंतरासाठीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यात साडेतीन किलोमीटर अंतराची जलवाहिनी बुजविण्यात आली. तद्नंतर निधीअभावी सदरचे काम बंद पडले. सन २०११ साली बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी चार कोटी ७३ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली; मात्र पूर्वीचे दोन कोटी ८० लाख रुपये यातून वजावट करण्यात आले. १.६ क्षमतेचे जलशुिद्धकरण केंद्र, साडेतीन लक्ष लिटरचा जलकुंभ, वितरण व्यवस्था, बोरीचा पाडा व टेकाडीपाडा या भागासाठी स्वतंत्र जलवाहिनीद्वारे वितरण व्यवस्था अशा कामांचा त्यात समावेश आहे. पंपिंग मशीनच्या कामाचाही त्यात अंतर्भाव आहे. १ सप्टेंबर २०१५ पासून ते १८ महिन्यांच्या कालावधीत सदरचे काम ठेकेदारामार्फत पूर्ण करणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेत काम न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार आहे. आजच्या स्थितीत १५२० घरगुती व व्यावसायिक नळ कनेक्शनधारक आहेत. त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये वर्षाकाठी कररूपाने उत्पन्न मिळते. मात्र पाणीपुरवठा कर्मचारी पगार व वीजबिल ४० लाख रुपयांच्या घरात वार्षिक आर्थिक तरतुदीत जाते. नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर २४ तास पाणीपुरवठा करण्याचे ग्रामपालिकेचे नियोजन असले तरी भविष्यात हा खर्च दुपटीने वाढू शकतो. त्यामुळे हा पांढरा हत्ती पोसणे आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक बाब आहे. वणी- पिंपळगाव रस्त्यावर दोन लाख लिटर, टेकाडीपाडा एक लाख लिटर, बोरीचा पाडा पन्नास हजार लिटर, दत्तनगर दहा हजार लिटर, जगदंबानगर दहा हजार लिटर, विश्रामबाग पाडा पंचवीस हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ कार्यान्वित आहेत. वणीचा वाढता विस्तार, पाण्याचा वापर याचा समन्वय साधून पाण्याची गरजपूर्तीपेक्षा पाण्याचा वापर अधिक आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता, वितरण व्यवस्था, नियोजन आखण्यासाठी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी गतिमानता देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)