शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

कोलती नदीवरील अरुंद पुलामुळे अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:50 IST

देवळा : प्रस्तावित नवीन पुल उभारण्याची मागणी

ठळक मुद्देदहा वर्षांपूर्वी माजी मंत्री स्व. ए.टी. पवार यांच्या पुढाकारातून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोलती नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली.

देवळा : देवळा बसस्थानकाकडून दुर्गामाता मंदिरात जाण्यासाठी दहा वर्षांपूर्वी कोलती नदीवर बांधण्यात आलेला पूल अरूंद असल्यामुळे आता तो अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पाठीमागे कोलती नदीवर प्रस्तावित असलेल्या नवीन पुलाची निर्मिती करून नागरीकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी भाविकांनी तसेच शेतकऱ्यांनी केली आहे.कोलती नदीच्या काठावर असलेल्या ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. परंतु कोलती नदीला पाणी वाहत असेल तर भाविकांची मंदिरात जाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. दहा वर्षांपूर्वी माजी मंत्री स्व. ए.टी. पवार यांच्या पुढाकारातून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोलती नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. हा पूल सबमर्सिबल असल्यामुळे त्याला कठडे नाहीत. ह्या पुलाचा लाभ भाविकांबरोबरच मंदिर परीसरात शेतावर वस्ती करून राहत असलेल्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांना देखील झाला. पावसाळयात नदीला पूर आला तर ह्या शेतकºयांचा गावाशी असलेला संपर्क तूटून जात असे. रूग्णाला दवाखान्यात आणणे, तसेच शेतीमालाची वाहतूक करणे देखील शक्य होत नसे. पुलाच्या निर्मितीमुळे त्यांची मोठी गैरसोय दूर झाली. तसेच मंंदिर परिसरात रविवारी भरणाºया आठवडे बाजारात जाणाºया नागरीकांची व वाहनांची चांगली सोय झाली. परंतु रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी ह्या पुलावर नागरीकांची मोठी गर्दी होते. पूल अरूंद असून पुलाच्या काठावर दोन्ही बाजूनी भाजीपाला विक्र ेते आपला भाजीपाला समोर ठेवून विक्री करत असतात. भाजीपाला घेणारे ग्राहक जागेवरच थांबतात. विक्र ेत्यांच्या व ग्राहकांच्या गर्दीतून मार्ग काढत पुलावरून जावे लागते. यामुळे हया पुलावर येणाºया व जाणाºया ग्राहकांची एकच गर्दी उसळते. खिसेकापूंसाठी हि गर्दी म्हणजे पर्वणीच असते. तसेच मंदीर परीसरात राहणाºया शेतकºयांना त्यांची वाहने गावात आणणे शक्य होत नाही. यामुळे नवीन पुलाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक