शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी चोरट्या वृक्षतोडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 14:57 IST

मुंजवाड : बागलाण तालूक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या साल्हेर किल्यावरील वनसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ला परिसर दिवसेंदिवस उजाड होत आहे. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : निसर्गप्रेमी नागरिकात संतापमुंजवाड : बागलाण तालूक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या साल्हेर किल्यावरील वनसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ला परिसर दिवसेंदिवस उजाड होत आहे. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.साल्हेर किल्याच्या पायथ्याशी वन विभागाचे कार्यालय असून या ठिकाणी पर्यटकांसाठी विश्रामगृहात निसर्ग परिचय केंद्रही उभारले आहे. तरीदेखील या परिसरातील वनराई चोरटया मार्गाने नामशेष करण्याचा प्रयत्न होत असतांना वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये तसेच निसर्गप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.साल्हेर किल्याच्या परिसराचा विकास व्हावा तसेच पर्यटकांची वर्दळ वाढून या परिसरातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वीच या परिसरातील जंगलाची छुपी वृक्षतोड होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. किल्याच्या पायथ्याशी भवानी मातेचे पुरातन मंदिर असून या परिसरात त्या काळी असलेल्या वसाहतीचे अवशेष भग्न अवस्थेत त्याची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत आहेत. जून्या वसाहतीच्या घरांमध्ये आज मोठमोठी आंबा, चिंच, जांभूळ, सादडा तसेच करवंदीच्या जाळी वाढल्या आहेत. या जाळींमध्ये घरांचे अवशेष, पाण्याची विहीर, दळणाचे जाते नजरेस पडतात. या परिसरातील आंबे दिल्लीच्या बादशाहास खास नजराना म्हणून पाठवला जात असे. आजही किल्लाच्या पायथ्याशी अवाढव्य अशी आम्रवृक्षाची झाडे पहावयास मिळतात. या आंब्यांना खास गोडी आहे. परंतू चोरट्या वृक्षतोडीमुळे या भागातील वनसंपदा वन विभागाच्या अनास्थेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दोन राज्यांच्या सीमेवर असलेला हा दुर्गम भाग आहे. संपूर्ण आदीवासी परिसर असून स्वयंपाकासाठी लाकडी सरपणाचा उपयोग मोठया प्रमाणात होत असल्यामुळेही वृक्षतोड नेहमीचीच झाली आहे. सरपणासाठी केली जाणारी वृक्षतोड थांबावी यासाठी या भागातील रहिवाशांना शासनाकडून मोफत गॅस वाटप करण्यात आले. त्याचा वापर होतो की नाही याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. वनविभागाने वेळीच लक्ष देऊन ही वनसंपदा वाचवावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.कोट...ऐतिहासीक साल्हेर, मुल्हेर किल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पुरातन वृक्ष असून या वृक्षांची अशीच लुट सुरु राहिल्यास हा परिसर बोडका होण्यास वेळ लागणार नाही. हा वारसा जपण्याची स्थानिक रहिवाशांसह वन विभागाचीही जबाबदारी आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन वृक्षतोड थांबवावी.- राहुल पाटील, नगरसेवक, सटाणाकोट...साल्हेर किल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या वृक्षतोडीचा प्रकार संतापजनक असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यावर आळा घालण्यात येईल. येथील पन्नास एकरात भव्य शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प आमदारांनी केला आहे. शिवसृष्टी निर्माण झाल्यानंतर वृक्षतोडीलाही आळा बसेल.- बिंदूशेठ शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान सेल, सटाणा

टॅग्स :Nashikनाशिक