शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:52 IST

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.

ठळक मुद्देकळवण : हजारो क्यूसेसने पाणी विसर्ग; गावांचा संपर्क तुटला; नद्यांना आला पूर

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने पाळे खुर्द, एकलहरे, हिंगळवाडी, भादवन, बिजोरे, परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून पर्यायी व्यवस्था असल्याने पर्यायी मार्गाने ग्रामस्थांनी मार्ग काढला. चणकापूरमधून रात्री ७६३० तर रविवारी दुपारी १७१९१ व चार वाजता १५५९३ क्यूसेसने पाणी विसर्ग होत असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासनाने नदीकाढावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शुक्र वार व शनिवारच्या पावसाच्या सततधार मुळे १६१४ दशलक्ष घनफूट साठा (६६ टक्के) चणकापूर धरणात उपलब्ध झाल्याने रात्री १२ धरणाच्या चार वक्र ाद्वारातून ४३६० क्यूसेस इतक्या प्रवाहाने गिरणा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आले होते.शनिवारी सकाळी धरणाच्या सात वक्र ाद्वारे दोन फुटाने उघडून त्याद्वारे ७६३० क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आले असून पावसाची सततधार अशीच चालू राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असून बेहडा व इतर नदी नाले व पुनंद धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीपात्र १२००० ते १५००० क्यूसेस प्रवाहाने वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पूरपाणी सोडण्यात आल्याने, गोसराने, अभोणा, पाळे बु., पाळे खु., बेज, नाकोडे, कळवण, एकलहरे, बगडू, पिळकोस, सुपले दि., काठरे दि., सुळे, पिंपळे खु., पिंपळे बु., देसराणे, नाळीद, मोकभणगी, खेडगाव, ककाणे या नदीकाठावरील गावांना पूरपाण्याचा फटका बसला बसण्याची शक्यता असून शेती व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील तांबडी, बेहडी नदीला पूर आला असून, तालुक्यातील धनोली, भेगू, ओतूर, नांदुरी, गोबापूर आदींसह लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरल्याने पूरपाणी नदीपात्रात पाणी विसर्ग होत असल्याने तालुक्यातील नदी नाल्याना पूर आल्याने शेतात पूरपाणी घुसल्याने शेतांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गिरणा, पुनंद, बेहडा, तांबडी नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी कळवण, अभोणा, मानूर, जुनीबेज, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, दळवट, मोकभणगी, पिळकोस गावातील नागरिकांनी नदीपात्रालगत एकच गर्दी केली होती. चणकापूर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असून तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे १०० टक्के भरली आहेत. येत्या २ ते ३ दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून धरणातून हजारो क्युसेस पूरपाणी सोडण्यात वाढ केली येणार आहे. कळवण तालुक्यातील छोटी व मोठी लपा प्रकल्प १०० टक्के भरली जाणार असल्याने भविष्यातील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून शेकडो पाझर तलाव व सिमेंट बंधारे पावसामुळे फुल भरल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ होणार आहे.