शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:52 IST

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.

ठळक मुद्देकळवण : हजारो क्यूसेसने पाणी विसर्ग; गावांचा संपर्क तुटला; नद्यांना आला पूर

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने पाळे खुर्द, एकलहरे, हिंगळवाडी, भादवन, बिजोरे, परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून पर्यायी व्यवस्था असल्याने पर्यायी मार्गाने ग्रामस्थांनी मार्ग काढला. चणकापूरमधून रात्री ७६३० तर रविवारी दुपारी १७१९१ व चार वाजता १५५९३ क्यूसेसने पाणी विसर्ग होत असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासनाने नदीकाढावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शुक्र वार व शनिवारच्या पावसाच्या सततधार मुळे १६१४ दशलक्ष घनफूट साठा (६६ टक्के) चणकापूर धरणात उपलब्ध झाल्याने रात्री १२ धरणाच्या चार वक्र ाद्वारातून ४३६० क्यूसेस इतक्या प्रवाहाने गिरणा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आले होते.शनिवारी सकाळी धरणाच्या सात वक्र ाद्वारे दोन फुटाने उघडून त्याद्वारे ७६३० क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आले असून पावसाची सततधार अशीच चालू राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असून बेहडा व इतर नदी नाले व पुनंद धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीपात्र १२००० ते १५००० क्यूसेस प्रवाहाने वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पूरपाणी सोडण्यात आल्याने, गोसराने, अभोणा, पाळे बु., पाळे खु., बेज, नाकोडे, कळवण, एकलहरे, बगडू, पिळकोस, सुपले दि., काठरे दि., सुळे, पिंपळे खु., पिंपळे बु., देसराणे, नाळीद, मोकभणगी, खेडगाव, ककाणे या नदीकाठावरील गावांना पूरपाण्याचा फटका बसला बसण्याची शक्यता असून शेती व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील तांबडी, बेहडी नदीला पूर आला असून, तालुक्यातील धनोली, भेगू, ओतूर, नांदुरी, गोबापूर आदींसह लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरल्याने पूरपाणी नदीपात्रात पाणी विसर्ग होत असल्याने तालुक्यातील नदी नाल्याना पूर आल्याने शेतात पूरपाणी घुसल्याने शेतांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गिरणा, पुनंद, बेहडा, तांबडी नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी कळवण, अभोणा, मानूर, जुनीबेज, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, दळवट, मोकभणगी, पिळकोस गावातील नागरिकांनी नदीपात्रालगत एकच गर्दी केली होती. चणकापूर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असून तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे १०० टक्के भरली आहेत. येत्या २ ते ३ दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून धरणातून हजारो क्युसेस पूरपाणी सोडण्यात वाढ केली येणार आहे. कळवण तालुक्यातील छोटी व मोठी लपा प्रकल्प १०० टक्के भरली जाणार असल्याने भविष्यातील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून शेकडो पाझर तलाव व सिमेंट बंधारे पावसामुळे फुल भरल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ होणार आहे.