शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पाण्याचे आवर्तन वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:13 IST

मालेगाव शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे.

ठळक मुद्देमौलाना मुफ्ती मो. इस्माईल : कालवा सल्लागार समितीची बैठक

मालेगाव : शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आमदार मुफ्ती यांनी हद्दवाढीत समाविष्ट सात गावांमुळे मालेगावची लोकसंख्या सुमारे साडेसात लाखांच्या झाली आहे. वाढती लोकसंख्या पाहता मिळणारे पाणी शहराला कमी पडत आहे. गिरणा धरणाची क्षमता २१ हजार ५०० दलघफू आहे. मालेगावसाठी ९०० दलघफू पाणी मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात ६०० दलघफू पाणी मिळत आहे.परिणामी शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे ४०० दलघफू पाणी वाढवून ते किमान एक हजार एमसीएफटीकरावे. चणकापूर धरणातून १६०० दलघफूची मागणी असताना केवळ १४०० एमसीएफटी पाणी दिले जाते. जुलै २०२० पर्यंत चार आवर्तनांची मंजुरी आहे. पाणीटंचाईचाविचार करता एक आवर्तन वाढून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली.तळवाडे साठवण तलावाची क्षमता वाढली तरी हे पाणी केवळ ७० ते ७५ दिवसच पुरते. पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागाकडून माहिती मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कालवा सल्लागार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.भायगाव, सोयगाव, कलेक्टरपट्टा, द्याने, म्हाळदे, दरेगाव, सायने ही सात गावे २०११ ला महापालिकेत समाविष्ट झाली. लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा वापर व मागणी वाढत आहे. चणकापूरची २० किलोमीटर अंतराची जलवाहिनी ४० वर्षे जुनी आहे. परिणामी अनेक ठिकाणी पाणीगळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. या सर्व बाबींचा विचार करून वाढीव पाणी देण्यास मंजुरी देत नवीन जलवाहिनीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपात