शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ, उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 01:01 IST

पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भरमसाठ खर्च करूनही कांदा बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली आहे.

ठळक मुद्देपाटोदा परिसर; काढणीला वेग; शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल

पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भरमसाठ खर्च करूनही कांदा बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली आहे. बहुतांश कांद्याला डोंगळे, तसेच दुभाळके निघाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, तो पुरता हतबल झाला आहे. सध्या कांदा काढणीला वेग आला असून, बहुतांशी शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.पाटोदा गाव आणि परिसरात उन्हाळी कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे बाजार समित्याही काही काळ बंद राहत आहे. आजमितीस कांद्यास सरासरी पाच ते पंधरा रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. बाजार समित्या सुरू झाल्या तरी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाव पुन्हा कोसळण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. या उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमताही जास्त असल्याने व पुढील काही काळात भाव वाढेल या आशेवर शेतकऱ्यांचा कांदा चाळीत साठविण्याकडे कल वाढला आहे. साधारण कांदा काढणी व साठवणुकीची प्रक्रिया ही अजून काही दिवस सुरूच राहणार आहे.या परिसरात नगदी पीक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात पोळ, रांगडा व उन्हाळ असे सर्वच उत्पादन या भागातील शेतकरी घेत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे तीन ते चार वेळेस कांदा बियाणे टाकूनही रोप खराब झाल्यामुळे शेतकरी वर्गाने उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात बियाणे व रोप आणून कांदा लागवड केली. उन्हाळ कांद्याची लागवड ही साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. मात्र, यावर्षी बियाणे, रोपामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र, उत्पन्नात निम्म्यापेक्षा जास्त मोठी घट आली आहे. त्यातच उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.मागील काही वर्षांपासून या भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत साठवून ठेवतात. मात्र, वर्षभर कांदा साठवून ठेवूनही व एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांना कांदा मातीमोल भावात विकावा लागतो. बाजारभाव व केलेला खर्चही निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. सध्या कांद्याला पाच ते पंधरा रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा केलेला खर्चही फिटणार नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभावात कमालीचा चढ-उतार होत असल्याने कांदा साठवून ठेवला जात आहे. मागील वर्षी मोठ्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आज ना उद्या भाव वाढतील असे वाटत होते. मात्र, संपूर्ण वर्षभर कांद्याचे भाव वाढले नाहीत. साठवून ठेवलेला निम्म्यापेक्षा जास्त कांदा चाळीतच सडून गेला. कांदा मातीमोल भावात विकावा लागल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.- दौलत बोरनारे, कांदा उत्पादक, पाटोदाशेतकरी वर्गाची तारांबळसध्या शेतकरी वर्गाची उन्हाळी कांदा काढणी व कांदा चाळीत साठविण्याची मोठी लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी चाळी नसल्याने व नवीन चाळीचे बांधकाम करण्यासाठी लॉकडाऊनमुळे साहित्य मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून झाडाच्या सावलीखाली पोळ लावून ठेवल्या आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून परिसरात कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने झाडाखालील कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी