शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ, उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 01:01 IST

पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भरमसाठ खर्च करूनही कांदा बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली आहे.

ठळक मुद्देपाटोदा परिसर; काढणीला वेग; शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल

पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भरमसाठ खर्च करूनही कांदा बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली आहे. बहुतांश कांद्याला डोंगळे, तसेच दुभाळके निघाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, तो पुरता हतबल झाला आहे. सध्या कांदा काढणीला वेग आला असून, बहुतांशी शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.पाटोदा गाव आणि परिसरात उन्हाळी कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे बाजार समित्याही काही काळ बंद राहत आहे. आजमितीस कांद्यास सरासरी पाच ते पंधरा रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. बाजार समित्या सुरू झाल्या तरी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाव पुन्हा कोसळण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. या उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमताही जास्त असल्याने व पुढील काही काळात भाव वाढेल या आशेवर शेतकऱ्यांचा कांदा चाळीत साठविण्याकडे कल वाढला आहे. साधारण कांदा काढणी व साठवणुकीची प्रक्रिया ही अजून काही दिवस सुरूच राहणार आहे.या परिसरात नगदी पीक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात पोळ, रांगडा व उन्हाळ असे सर्वच उत्पादन या भागातील शेतकरी घेत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे तीन ते चार वेळेस कांदा बियाणे टाकूनही रोप खराब झाल्यामुळे शेतकरी वर्गाने उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात बियाणे व रोप आणून कांदा लागवड केली. उन्हाळ कांद्याची लागवड ही साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. मात्र, यावर्षी बियाणे, रोपामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र, उत्पन्नात निम्म्यापेक्षा जास्त मोठी घट आली आहे. त्यातच उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.मागील काही वर्षांपासून या भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत साठवून ठेवतात. मात्र, वर्षभर कांदा साठवून ठेवूनही व एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांना कांदा मातीमोल भावात विकावा लागतो. बाजारभाव व केलेला खर्चही निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. सध्या कांद्याला पाच ते पंधरा रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा केलेला खर्चही फिटणार नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभावात कमालीचा चढ-उतार होत असल्याने कांदा साठवून ठेवला जात आहे. मागील वर्षी मोठ्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आज ना उद्या भाव वाढतील असे वाटत होते. मात्र, संपूर्ण वर्षभर कांद्याचे भाव वाढले नाहीत. साठवून ठेवलेला निम्म्यापेक्षा जास्त कांदा चाळीतच सडून गेला. कांदा मातीमोल भावात विकावा लागल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.- दौलत बोरनारे, कांदा उत्पादक, पाटोदाशेतकरी वर्गाची तारांबळसध्या शेतकरी वर्गाची उन्हाळी कांदा काढणी व कांदा चाळीत साठविण्याची मोठी लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी चाळी नसल्याने व नवीन चाळीचे बांधकाम करण्यासाठी लॉकडाऊनमुळे साहित्य मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून झाडाच्या सावलीखाली पोळ लावून ठेवल्या आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून परिसरात कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने झाडाखालील कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी