शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

ओझरनजीक वाहतूक कोंडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 18:21 IST

सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरुग्ण, विद्यार्थ्यांचे हाल : पोलिसांच्या पावती फाड मोहीमेमुळे संताप

ओझर : सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.महामार्गावर नाशिक ते ओझरदरम्यान काही वर्षांपूर्वी सहा पदरीकरण झाले होते. परंतु ओझर येथील खंडेराव मंदिर, गडाख कॉर्नर, लक्ष्मीनगर, जत्रा हॉटेल, हनुमाननगर, अमृतधाम येथे कायम होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहनधारक त्रस्त होते. परिणामी लेट का होईना येथे कामं मंजूर झाली व तीन उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला.वाहतुकीचे तीन तेरायेथील तात्पुरती वाहतूक पोलीस चौकी मात्र दंड वसुलीचे ठिकाण बनल्याचे दिसून आल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. चांदवड, पिंपळगाव, ओझर, आडगाव येथून दररोज हजारो नागरिक, अनेक रुग्ण, नोकरदार, विद्यार्थी नाशिक शहरात ये-जा करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. सदर वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून दंड वसुलीच्या नावाखालीच अनेक वेळा स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस झालेली कोंडी वाऱ्यावर सोडून देत असल्याने त्याचा फटका सामान्य माणसाला बसतोय. याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच नोकरदार, विद्यार्थिवर्गाने याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.सदर कामांना सुरुवात झाल्यानंतर येथे सकाळ सायंकाळ होत असलेली वाहतूक कोंडी वाहधारकांना डोकेदुखी ठरत असताना ती सुरळीत करण्यासाठी अमृतधाम, हनुमाननगर येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या समवेत हंगामी कर्मचारी वाहनांच्या रांगा सुरळीत करीत असताना पोलीस मात्र त्या कोंडीत भर घालत असल्याचे चित्र बघण्यास मिळत असून, एकेरी करण्यात आलेल्या रस्त्यावर अवजड वाहनदेखील मोठ्या प्रमाणावर ये - जा करत असताना समांतर रस्त्याचा उपायदेखील उपलब्ध असून, केवळ त्याचा सुरळीत अवलंब केला जात नाही. जिथे क्र ॉसिंग आहे तिथे चेहरा पाहून सर्वच प्रकारच्या वाहनांना अडविले जाते व जोपर्यंत देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी झालेली असते.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस