शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पूराच्या पातळीत वाढ; गंगापूरमधून ८हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:13 IST

गंगापूर धरणाचा जलसाठा दुपारपर्यंत ८४.५१ टक्के इतका असून धरणात ४ हजार ७५८ दलघफूपर्यंत पाणयाची पातळी वाढली आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता एक हजाराने वाढ करण्यात येऊन विसर्ग ८ हजार ८३३ क्युसेकपर्यंत पाणी धरणातून सोडले जात आहे. शहरातदेखील संततधार सकाळपासून सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे.

ठळक मुद्देगंगापूर धरणाचा दुपारपर्यंत जलसाठा ८४.५१ टक्केहोळकर पूलाखालून रामकुंडात ११ हजार २१० क्युसेक पाणी प्रवाहित नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोदावरीने धोक्याची पातळी गाठली

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून अद्यापपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. केवळ गंगापूर धरणाच्याक्षेत्रात मंगळवारी सकाळपर्यंत २३८ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच मंगळवारी सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत ६४ मि.मी पाऊस केवळ गंगापूरच्या क्षेत्रात नोंदविला गेला. त्यामुळे पाण्याची जोरदार आवक धरणात पाणलोटक्षेत्रातून होऊ लागल्याने दुपारपासून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या ८ हजार ८३३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीची पुराची पातळी वाढली आहे. पाणलोटक्षेत्रात असाच पाऊस सायंकाळपर्यंत सुरू राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती पूर नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा दुपारपर्यंत ८४.५१ टक्के इतका असून धरणात ४ हजार ७५८ दलघफूपर्यंत पाणयाची पातळी वाढली आहे.

सोमवारी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे सायंकाळपर्यंत पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली. सायंकाळी सहा वाजता ६ हजार ५०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला. सोमवारी रात्री आठ वाजेपासून ७ हजार ८३३ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला. मंगळवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता एक हजाराने वाढ करण्यात येऊन विसर्ग ८ हजार ८३३ क्युसेकपर्यंत पाणी धरणातून सोडले जात आहे. शहरातदेखील संततधार सकाळपासून सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. तसेच गोदाकाठावरील दुतोंड्या मारूतीच्या मुर्तीच्या छातीपर्यंत पाणी लागले आहे. नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू पुलाला पाणी लागले आहे. या पूलावरूनही प्रवेश बंद करण्यात आला आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरणgodavariगोदावरीRainपाऊसfloodपूर