शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

द्राक्ष निर्यातीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:07 IST

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर्यात झाली होती, तर एकट्या रशियात सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, श्रीलंका, बांगलादेश, मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनांचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देएक लाख टन : इंग्लंड, युरोपसह रशियामध्येही भारतीय द्राक्षांना मागणी

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर्यात झाली होती, तर एकट्या रशियात सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, श्रीलंका, बांगलादेश, मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनांचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्ष युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख टन द्राक्ष निर्यात झाली आहे. पाणीटंचाई, दीर्घकाळ रेंगाळलेली थंडी याचा परिणाम होऊनही यंदा द्राक्षांची आवक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा गारपिटीसारखी मोठी आपत्ती द्राक्षांवर कोसळली नाही. त्यामुळे द्राक्षांचे उत्पादन वाढलेले असताना देशांतर्गत तसेच युरोपच्या बाजारपेठेत आवक जास्त असल्याने द्राक्ष बाजारात मंदीचेच वातावरण पहायला मिळाले.पेरू देशाच्या द्राक्षांसोबत प्रथमच स्पर्धा युरोपीय बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची स्पर्धा दक्षिण आफ्रिका व चिली यांसारख्या देशांमध्ये उत्पादित होणाऱ्या द्राक्षांसोबत असते. यंदा त्यात पहिल्यांदाच पेरूची भर पडली. फेब्रुवारीपर्यंत एकट्या पेरूमधून युरोपात१५ हजार टनांची द्राक्ष निर्यात झाली होती. त्याशिवाय भारतातून दर आठवड्याला होणाऱ्या कंटेनरच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ होतहोती. या स्थितीत निर्यातक्षम द्र्राक्षांच्या दरातही यंदा ३ ते ४ युरोंनी घट झाली होती. परंतु आता परिस्थिती सुधारली असून, लेट हार्व्हेस्टिंग झालेल्या मालाला चांगली मागणी मिळत आहे. द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, जवळपास ८० टक्के हंगाम आटोपला आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत द्राक्षांच्या दरात ४० ते ५० टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, दर वाढल्यामुळे परराज्यातून मागणी काही प्रमाणात स्थिरावली आहे. द्राक्षांना प्रतिकिलोला किमान ३५ ते ४५ व सरासरी ४० रुपये दर मिळाला असून, अखेरच्या टप्प्यात निर्यातक्षम द्राक्षांना ९० रुपयांपर्यंतही दर मिळत आहे. येत्या काही कालावधीत हा दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे.- माणिकराव पाटील, माजी अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ