शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष निर्यातीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:07 IST

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर्यात झाली होती, तर एकट्या रशियात सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, श्रीलंका, बांगलादेश, मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनांचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देएक लाख टन : इंग्लंड, युरोपसह रशियामध्येही भारतीय द्राक्षांना मागणी

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर्यात झाली होती, तर एकट्या रशियात सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, श्रीलंका, बांगलादेश, मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनांचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्ष युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख टन द्राक्ष निर्यात झाली आहे. पाणीटंचाई, दीर्घकाळ रेंगाळलेली थंडी याचा परिणाम होऊनही यंदा द्राक्षांची आवक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा गारपिटीसारखी मोठी आपत्ती द्राक्षांवर कोसळली नाही. त्यामुळे द्राक्षांचे उत्पादन वाढलेले असताना देशांतर्गत तसेच युरोपच्या बाजारपेठेत आवक जास्त असल्याने द्राक्ष बाजारात मंदीचेच वातावरण पहायला मिळाले.पेरू देशाच्या द्राक्षांसोबत प्रथमच स्पर्धा युरोपीय बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची स्पर्धा दक्षिण आफ्रिका व चिली यांसारख्या देशांमध्ये उत्पादित होणाऱ्या द्राक्षांसोबत असते. यंदा त्यात पहिल्यांदाच पेरूची भर पडली. फेब्रुवारीपर्यंत एकट्या पेरूमधून युरोपात१५ हजार टनांची द्राक्ष निर्यात झाली होती. त्याशिवाय भारतातून दर आठवड्याला होणाऱ्या कंटेनरच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ होतहोती. या स्थितीत निर्यातक्षम द्र्राक्षांच्या दरातही यंदा ३ ते ४ युरोंनी घट झाली होती. परंतु आता परिस्थिती सुधारली असून, लेट हार्व्हेस्टिंग झालेल्या मालाला चांगली मागणी मिळत आहे. द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, जवळपास ८० टक्के हंगाम आटोपला आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत द्राक्षांच्या दरात ४० ते ५० टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, दर वाढल्यामुळे परराज्यातून मागणी काही प्रमाणात स्थिरावली आहे. द्राक्षांना प्रतिकिलोला किमान ३५ ते ४५ व सरासरी ४० रुपये दर मिळाला असून, अखेरच्या टप्प्यात निर्यातक्षम द्राक्षांना ९० रुपयांपर्यंतही दर मिळत आहे. येत्या काही कालावधीत हा दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे.- माणिकराव पाटील, माजी अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ