शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:12 IST

नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांचा साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त ५१३२ इतका जलसाठा होता. धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत गेल्या वर्षी फक्त ८ टक्के साठा असताना यंदा मात्र धरणामध्ये २०३९४ दशलक्ष घनफूट इतका ३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : जिल्ह्यात ३१ टक्के जलसाठाबुधवारी रात्रीपासूनच या बंधाºयातून २०,४७४ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचे विसर्ग

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसाने लावलेली हजेरी व त्यापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाने तयार झालेले वातावरणामुळे झालेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार असून, यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत चारपट म्हणजेच ३१ टक्के जलसाठा सध्या धरणांमध्ये उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणात ४७ तर दारणा धरणातही ५६ टक्के इतका समाधानकारक साठा असल्यामुळे तुर्त पाण्याचे संकट टळल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांचा साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त ५१३२ इतका जलसाठा होता. धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत गेल्या वर्षी फक्त ८ टक्के साठा असताना यंदा मात्र धरणामध्ये २०३९४ दशलक्ष घनफूट इतका ३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मान्सूनपुर्व पावसाने लावलेली हजेरी व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पुर परिस्थिती निर्माण झाली असून, जमीनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्याने यापुढे पावसाचे पाणी थेट धरणांना जावून मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. बुधवारी झालेल्या पावसामुळे अजून पाणी धरणापर्यंत पोहोचलेले नसले तरी, गोदावरी, दारणा व कादवा अशा तिन्ही नद्यांचे नांदुरमध्यमेश्वर बंधा-यात पाणी जमा होत असल्याने व तो शंभर टक्के पुर्णपणे भरल्याने बुधवारी रात्रीपासूनच या बंधा-यातून २०,४७४ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचे विसर्ग केले जात आहे. हे पाणी कोपरगाव मार्गे मराठवाड्याकडे झेपावेल.नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापूर धरणात ४७ टक्के इतका जलसाठा असून, धरण समुहात ३५ टक्के पाणी आहे. तर सर्वात मोठे दारणा धरणात सर्वाधिक म्हणजे ५६ टक्के, तर चणकापूर २७, हरणबारी ३२, गिरणा ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक