शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 15:13 IST

मानोरी : गेल्या पंधरा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदला मुळे शेतकरी आधीच पुरता त्रस्त झाला असून हवामानात खात्याने या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचे समजताच अजून शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे.

मानोरी : गेल्या पंधरा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदला मुळे शेतकरी आधीच पुरता त्रस्त झाला असून हवामानात खात्याने या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचे समजताच अजून शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागती मध्ये गहू सोंगणी,हरबरा काढणी,कांदे काढणे अशी कामे जोरात सुरू असल्याचे दृश्य दिसत आहे. कांदा, गहू पिकाला गेल्या दहा - बारा दिवसांपूर्वी एक ते दोन पाण्याची मोलाची गरज भासत होती.कांदा पीक पाण्याविना करपू लागली होती. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने करत पाणी मिळवुन पिकांना मोठ्या प्रमाणात जीवनात दिले होते.परंतु मागील तीन ते चार दिवसांत परिस्थिती बदलून ढगाळ वातावरणामुळे रिमझिम पाऊस पडू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कांदे काढून विकावे की साठवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशातील काळ्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस कधी बरसेल याचा अंदाज नसल्याने आधीच कमी दरात कांद्याला भाव मिळत असल्याने अशा वातावरणात तर अजून तोटा सहन करावा लागेल त्यामुळे कांदा पिकाला झालेला खर्च भरून निघण्याची सुद्धा नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते ,कांदे काढणीला सात हजार रु पये प्रति एकर भाव ,मजुरांना शेतात पोहचवण्यासाठी भाडोत्री गाडी ,आदी खर्च करून योग्य दर जर मिळाला नाही तर तेल ही गेले अन तूप ही गेले अशा शब्दात शेतकरी बोलत आहे. गव्हाच्या पिकाची परिस्थिती कांद्याच्या पिकासारखी झाली आहे.गहू सोंगणी ला मजूर मिळत नसल्याने अशा ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टिंग मशीन द्वारे गहू सोंगणी ला प्राधान्य दिले जात असून मागील दोन दिवसांत शेतकरी त्यांच्या मागावर आहे .एक हजार ते बाराशे रु पये प्रति एकर भाव देऊनही मशीन मिळत नसल्याने पावसाने जर धुमाकूळ घातला तर वाळलेले गव्हाचे पीक भुईसपाट होण्यास वेळ लागणार नाही.त्यामुळे तोंडाशी आलेला घास ओढला जातो की काय ? अशा शब्दात शेतकरी चर्चा जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक