शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 15:13 IST

मानोरी : गेल्या पंधरा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदला मुळे शेतकरी आधीच पुरता त्रस्त झाला असून हवामानात खात्याने या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचे समजताच अजून शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे.

मानोरी : गेल्या पंधरा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदला मुळे शेतकरी आधीच पुरता त्रस्त झाला असून हवामानात खात्याने या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचे समजताच अजून शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागती मध्ये गहू सोंगणी,हरबरा काढणी,कांदे काढणे अशी कामे जोरात सुरू असल्याचे दृश्य दिसत आहे. कांदा, गहू पिकाला गेल्या दहा - बारा दिवसांपूर्वी एक ते दोन पाण्याची मोलाची गरज भासत होती.कांदा पीक पाण्याविना करपू लागली होती. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने करत पाणी मिळवुन पिकांना मोठ्या प्रमाणात जीवनात दिले होते.परंतु मागील तीन ते चार दिवसांत परिस्थिती बदलून ढगाळ वातावरणामुळे रिमझिम पाऊस पडू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कांदे काढून विकावे की साठवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशातील काळ्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस कधी बरसेल याचा अंदाज नसल्याने आधीच कमी दरात कांद्याला भाव मिळत असल्याने अशा वातावरणात तर अजून तोटा सहन करावा लागेल त्यामुळे कांदा पिकाला झालेला खर्च भरून निघण्याची सुद्धा नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते ,कांदे काढणीला सात हजार रु पये प्रति एकर भाव ,मजुरांना शेतात पोहचवण्यासाठी भाडोत्री गाडी ,आदी खर्च करून योग्य दर जर मिळाला नाही तर तेल ही गेले अन तूप ही गेले अशा शब्दात शेतकरी बोलत आहे. गव्हाच्या पिकाची परिस्थिती कांद्याच्या पिकासारखी झाली आहे.गहू सोंगणी ला मजूर मिळत नसल्याने अशा ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टिंग मशीन द्वारे गहू सोंगणी ला प्राधान्य दिले जात असून मागील दोन दिवसांत शेतकरी त्यांच्या मागावर आहे .एक हजार ते बाराशे रु पये प्रति एकर भाव देऊनही मशीन मिळत नसल्याने पावसाने जर धुमाकूळ घातला तर वाळलेले गव्हाचे पीक भुईसपाट होण्यास वेळ लागणार नाही.त्यामुळे तोंडाशी आलेला घास ओढला जातो की काय ? अशा शब्दात शेतकरी चर्चा जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक