शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST

देवगाव (त्र्यंबकेश्वर) : कोरोनामुळे बंद पडलेल्या बसच्या फेऱ्यांचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने ...

देवगाव (त्र्यंबकेश्वर) : कोरोनामुळे बंद पडलेल्या बसच्या फेऱ्यांचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने बंद पडलेली लाल परीची चाके पुन्हा रस्त्यावर धावावीत, अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची पकड जराशी सैल होताच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, वसतिगृह आणि बसच्या फेऱ्या अद्याप पूर्ववत नसल्याने त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत असून, वेळेवर वाहन न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव आदी परिसरातील विद्यार्थी वैतरणा येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिकत आहेत मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांना ये-जा करणे मुश्कील होत असून, खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे. परंतु, खासगी वाहनेदेखील त्यांच्या वेळेनुसार धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचे होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या विळख्याने लालपरीची चाके ग्रामीण भागात वळली नव्हती. दिसेनाशी झालेल्या लालपरीची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह महिला-पुरुष आणि ज्येष्ठांही लागून होती. ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताच काही बसच्या फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, अचानकपणे सुरू झालेल्या बसफेऱ्या मधेच बंद झाल्या. त्यामुळे सद्य:स्थितीत एकही बस ग्रामीण भागातील रस्त्यांवरून धावताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. त्र्यंबकेश्वर-देवगाव-येल्याचीमेट-घोटी ही एकमेव बस कोरोनानंतर सुरू झाली होती. या बसचा वेळ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेप्रमाणे असल्यामुळे हीच बस विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर होती. मात्र, अचानकपणे सुरळीत असणारी बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना दळणवळणाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊन प्रवासाला ब्रेक लागला आहे. बसअभावी रुग्ण, शेतकरी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

---

खासगी वाहनांकडून प्रवाशांची लयलूट

बससेवा बंदचा खासगी वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला असून, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांकडे बसपास असतो तर ज्येष्ठ नागरिकांकडे एकतृतीयांश भाडे असल्यामुळे खासगी वाहनांतून प्रवास करताना अधिक पैसे द्यावे लागतात.

-----

बस नसल्यामुळे आम्हांला तासन्तास बसून खासगी वाहनांची वाट बघावी लागते. खासगी वाहनांमध्ये दाटीवाटीने जागा नसल्यामुळे बसावे लागते. कधी कधी जागेअभावी जीपला लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन बंद असलेली येल्याचीमेट बस लवकर सुरू करावी.

- सिद्धांत रोकडे, विद्यार्थी, देवगाव