शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST

देवगाव (त्र्यंबकेश्वर) : कोरोनामुळे बंद पडलेल्या बसच्या फेऱ्यांचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने ...

देवगाव (त्र्यंबकेश्वर) : कोरोनामुळे बंद पडलेल्या बसच्या फेऱ्यांचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने बंद पडलेली लाल परीची चाके पुन्हा रस्त्यावर धावावीत, अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची पकड जराशी सैल होताच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, वसतिगृह आणि बसच्या फेऱ्या अद्याप पूर्ववत नसल्याने त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत असून, वेळेवर वाहन न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव आदी परिसरातील विद्यार्थी वैतरणा येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिकत आहेत मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांना ये-जा करणे मुश्कील होत असून, खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे. परंतु, खासगी वाहनेदेखील त्यांच्या वेळेनुसार धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचे होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या विळख्याने लालपरीची चाके ग्रामीण भागात वळली नव्हती. दिसेनाशी झालेल्या लालपरीची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह महिला-पुरुष आणि ज्येष्ठांही लागून होती. ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताच काही बसच्या फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, अचानकपणे सुरू झालेल्या बसफेऱ्या मधेच बंद झाल्या. त्यामुळे सद्य:स्थितीत एकही बस ग्रामीण भागातील रस्त्यांवरून धावताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. त्र्यंबकेश्वर-देवगाव-येल्याचीमेट-घोटी ही एकमेव बस कोरोनानंतर सुरू झाली होती. या बसचा वेळ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेप्रमाणे असल्यामुळे हीच बस विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर होती. मात्र, अचानकपणे सुरळीत असणारी बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना दळणवळणाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊन प्रवासाला ब्रेक लागला आहे. बसअभावी रुग्ण, शेतकरी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

---

खासगी वाहनांकडून प्रवाशांची लयलूट

बससेवा बंदचा खासगी वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला असून, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांकडे बसपास असतो तर ज्येष्ठ नागरिकांकडे एकतृतीयांश भाडे असल्यामुळे खासगी वाहनांतून प्रवास करताना अधिक पैसे द्यावे लागतात.

-----

बस नसल्यामुळे आम्हांला तासन्तास बसून खासगी वाहनांची वाट बघावी लागते. खासगी वाहनांमध्ये दाटीवाटीने जागा नसल्यामुळे बसावे लागते. कधी कधी जागेअभावी जीपला लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन बंद असलेली येल्याचीमेट बस लवकर सुरू करावी.

- सिद्धांत रोकडे, विद्यार्थी, देवगाव