शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:11 IST

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून पाटोदा परिसरात ढगाळ हवामान आहे. त्यात रब्बी पिकांना पोषक असलेली थंडी गायब झाल्याने कांदा ...

ठळक मुद्देथंडी गायब : हवामान बदलाचा फटका ; कांदा पिकावर मावा

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून पाटोदा परिसरात ढगाळ हवामान आहे. त्यात रब्बी पिकांना पोषक असलेली थंडी गायब झाल्याने कांदा व कांदा रोपावर मावा, तुडतुडे व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर अळीचे अतिक्रमण वाढले आहे. रब्बीच्या पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी वर्गाला सकाळ-संध्याकाळ अशी दोन वेळेस औषधांची फवारणी करावी लागत आहे.ऐन पिके काढणीच्या सुमारास परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरीप हंगामातील पिकांची वाताहत झाली. या परतीच्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या कांदा पिकाचे व कांदा रोपे सडून गेल्यामुळे कांदा बियाणे व कांदा लागवडीसाठी एकरी पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न मानता पुन्हा नव्या उमेदीने भांडवल उभे करून रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली तसेच चार ते पाच हजार रुपये किलोचे महागडे कांदा बियाणे घेऊन कांदा लागवड केली.मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडी, पहाटे दवबिंदू तर दिवसभर ढगाळ हवामान, तर कधी कडक ऊन असे संमिश्र वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा, तुडतुडे तसेच करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा वावर वाढला आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍यांना औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. असेच वातावरण अजून काही दिवस राहिले तर रब्बी हंगामही वाया जाण्याची व मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी