शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

By suyog.joshi | Updated: March 5, 2024 17:10 IST

माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

नाशिक (सुयोग जोशी) : तब्बल आठवडाभरानंतर माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. काही आंदोलक रात्री उशिरापर्यंत तर काहीजण मंगळवारी दुपारपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. आंदोलकांना घरी जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेसची सोय करण्यात आली होती, तर काहीजणांनी सोबत आणलेल्या वाहनांतूनच घरी जाणे पसंत केले. 

या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील माकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात मुख्यत्वेकरून सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबक, कळवण, चांदवड तालुक्यातील कार्यकर्ते अधिक प्रमाणात सहभागी झाले होते. यात दिंडोरीचे रमेश चौधरी, देवीदास वाघ, माकपचे जिल्हा सदस्य संजाबाई खंबाईत, निर्मला चौधरी, चंद्रकांत वाघेरे, वसंतराव बागुल, माजी सभापती इंद्रजित गावित, उत्तम कडू, भिका राठोड, बाऱ्हेचे सरपंच देवीदास गावित, किसान सभेचे कार्यकारी सदस्य सावळीराम पवार, सुरगाणा तालुक्याचे सुभाष चाैधरी, त्र्यंबकचे इरफान शेख, रमेश बरफ, पेठमधून देवराम गायकवाड, मुरलीधर निंबकर, प्रभाकर गावित, चांदवडचे हनुमान गुंजाळ, कळवणचे संदीप वाघ, विलास चव्हाण, निंबा सोनवणे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शासनाने मागण्यांच्या पूर्ततेबाबत आम्हाला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. शासनाच्या आग्रहास्तव आम्ही आंदोलन मागे घेतले आहे. तीन महिन्यांत प्रत्यक्षेत काय अंमलबजावणी केली जाते त्याकडे आमचे लक्ष राहील. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. -जे.पी. गावित, माजी आमदार

मनपातर्फे परिसराची स्वच्छता : आंदोलक ज्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या देऊन बसले होते, त्या परिसराची महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी ३० साफसफाई कर्मचारी तसेच स्विपिंग मशीनचा वापर करून परिसर स्वच्छ करण्यात आल्याची माहिती विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, उरलेली लाकडं, राख, डिव्हायडर्समधील कचरा उचलला.

स्मार्ट रोड खुला : पालकमंत्री दादा भुसे व माजी आमदार जे. पी. गावित यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर काही आंदोलकांनी सोमवारी रात्रीच घराकडे कूच केली. त्यामुळे मंगळवारी सकाळी ९ ते ९.३० वाजेदरम्यान स्मार्ट रोड खुला झाला. यामुळे सकाळपासून त्र्यंबक नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली होती. मेहर सिग्नल ते महात्मा गांधी रोडपर्यंतचा रस्ताही बंद करण्यात आला होता. तोही रस्ता सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे रविवार कारंजाकडे अशोकस्तंभावरून जाणारी वाहतूक आता पूर्णत: मोकळी झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप