शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नाशिक जिल्ह्यात विंचूरला कांद्याला २४०१ रुपये भाव; आठ दिवसांनंतर उपबाजारात कांदा लिलाव

By धनंजय वाखारे | Updated: September 28, 2023 13:08 IST

अन्य समित्यांमध्ये मात्र बंद

विंचूर ( नाशिक) : जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद होते. व्यापारी व संचालक मंडळाच्य़ा बैठकी नंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात आज (गुरुवारी) सकाळच्या सत्रात कांदा लिलाव झाले. सकाळच्या सत्रात पाचशे तीस नगांची आवक झाली. कमीत कमी एक हजार, कमाल चोविसशे एक तर सरासरी एकविसशे पंचाहत्तर रुपये भाव मिळाला. 

अनंत चतुर्दशी असल्याने दुपारच्या सत्रातले लिलाव बंद ठेवण्यात आले. शुक्रवारपासून नियमितपणे दोन्ही सत्रातले लिलाव सुरु राहणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजारसमितीत सकाळी साडेआठच्या सुमारास लिलावाला प्रारंभ होताच, शेतकऱ्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह दिसून आला. गेल्या आठवड्यापासून कांदा व्यापा-यांच्या संपामुळे बाजार समित्या ठप्प झाल्या आहेत. कधीही बंद न राहणारे आणि इतर बाजार समित्यांनी अनुकरण केलेल्या विंचूर उपबाजार समितीच्या व्यापा-यांनी जिल्ह्यात आदर्श घालुन दिला आहे.  विंचूर उपबाजारात सकाळपासूनच शेतक-यांनी टॅक्टर, पिकअपमध्ये आपला कांदा लिलावासाठी आणला. आठ दिवसांपासून येथे कांदा लिलाव बंद असले तरी विंचूर उपबाजारात धान्याचे लिलाव सुरळीत होते. कांदा व्यापारी व संचालकांची बैठक झाली. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव आजपासून सुरू करण्यात आला आहे.- पंढरीनाथ थोरे, माजी सभापती तथा विद्यमान संचालक, लासलगाव बाजार समिती

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा