शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चिंताजनक! ३६५ दिवसांत राज्यात तब्बल १५९ बिबटे मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:38 IST

राज्यात बिबट्याची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे वारंवार बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून ही चिंताजनक बाब ...

राज्यात बिबट्याची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे वारंवार बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. २०२१ साली राज्यात १५९ पैकी ८४ बिबटे नैसर्गिक कारणांनी मृत्युमुखी पडले आहेत. यावरुन बिबट्यांना योग्य पुरेशे सुरक्षित खाद्यदेखील उपलब्ध होत नसून बिबट्यांना संसर्गजन्य आजारांची लागण होऊनदेखील मृत्यू ओढवत आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांनी राज्यात २९ बिबट्यांना चिरडून टाकले तर नाशिकच्या लहवितजवळील रेल्वे रुळावर एक बिबट्या चिरडून ठार झाला. वर्षभरात रेल्वेच्या लोहमार्गावर केवळ हाच एक अपघात घडला आहे. उर्वरित कुठल्याही जिल्ह्यात रेल्वेखाली चिरडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद वनखात्याच्या दप्तरी नाही.

वर्षभरात औरंगाबादमध्ये चार बिबट्यांची शिकार झाली आहे. रस्ते अपघात, किंवा विहीर, तलाव किंवा नदीमध्ये बुडून मृत्यमुखी पडलेल्या बिबट्यांच्या संख्येपेक्षा नैसर्गिक मृत्यू ओढावलेला आकडा मोठा आहे. संपूर्ण राज्यात ८४ बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ३७ बिबटे नाशिकमध्ये नैसर्गिक कारणाने मृत्युमुखी पडले आहेत. तसेच राज्यात विविध कारणास्तव बिबटे मृत्युमुखी पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक अग्रस्थानी आहे. नाशिकमध्ये ६६ तर पुण्यात ३३ बिबट्यांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला आहे.

बिबट्यांचा मृत्यू व कारणे अशी....

नैसर्गिक - ८४

वाहनांच्या धडकेत- २९

पाण्यात बुडून- ३४

शिकार-४

वीजेचा शॉक- २

अन्य कारणाने- ५

रेल्वेच्या धडकेत- १

शिकारीवर नियंत्रण

बिबट्यांच्या शिकारीवर नियंत्रण मिळविण्यास राज्यभरात वनखात्याला काही प्रमाणात यश आले आहे. २०२०च्या तुलनेत २०२१साली केवळ ४बिबट्यांची शिकार झाल्याची नोंद आहे. औरंगाबाद वनवृत्तामध्ये ही शिकार करण्यात आली आहे. २०२०साली राज्यात १७ तर २०१९साली नऊ बिबट्यांचा शिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बळी घेतला होता.

 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक