शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

टमाटा बाजारभावात सुधारणा; आवक कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:39 IST

तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते.

पंचवटी : तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते. सध्या नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाची आवक कमी प्रमाणात असून, मागणी असल्याने सध्या तरी टमाटा मालाचे बाजारभाव टिकून आहेत. नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाला दर्जानुसार प्रति किलो २० रुपये असा बाजारभाव मिळत आहे.  गेल्या मार्च महिन्यात टमाटा मालाची आवक वाढली होती त्यातच ज्या त्या बाजारपेठेत स्थानिक टमाटा माल दाखल होत असल्याने टमाटा २ रुपये प्रति किलो दराने विक्री होत होता. याशिवाय नाशिकच्या बाजार समितीतून पाकिस्तान, बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात टमाटा मालाची निर्यातही केली जायची मात्र भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे बॉर्डर बंद असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बॉर्डर बंद होती त्यामुळे परदेशातील निर्यात पूर्णपणे थांबली होती.  गेल्या पंधरवड्यापासून टमाटा मालाची आवक कमी होत चालल्याने बाजारभावात बºयापैकी सुधारणा झाली आहे. टमाटा मालाला (२०) किलो जाळीसाठी ४०० ते ४५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. टमाटा मालाला बाजारभाव नसल्याने अनेक शेतकºयांनी टमाटा पिकाकडे दुर्लक्ष केल्याने पीक नाश पावले होते, तर ज्यांनी टमाटा पिकाचे उत्पादन सुरू ठेवले होते त्यांना आजमितीस चांगला बाजारभाव मिळत आहे. बाजार समितीत आवक कमी झाल्याने तसेच मागणी असल्याने टमाटा मुंबई, गुजरात यांसह अन्य भागांत रवाना केला जात आहे. नाशिक बाजार समितीत टमाटा २० रुपये किलो, तर पुणे नारायणगाव या भागांत टमाटा मालाची आवक जास्त असल्याने टमाट्याला १३ ते १५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत आहे.टमाट्याला बॉर्डर बंदचनाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून पाकिस्तान तसेच बांग्लादेशात टमाटा मालाची आवक केली जाते. मात्र भारत- पाक सीमेवर अधूनमधून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे गेल्या वर्षी १५ आॅगस्टपासून बॉर्डर बंदच असल्याने नाशिकमधून जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे. आगामी कालावधीत बॉर्डर सुरू झाली तर टमाट्याचे बाजारभाव आणखी तेजित येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड