शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

टमाटा बाजारभावात सुधारणा; आवक कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:39 IST

तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते.

पंचवटी : तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते. सध्या नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाची आवक कमी प्रमाणात असून, मागणी असल्याने सध्या तरी टमाटा मालाचे बाजारभाव टिकून आहेत. नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाला दर्जानुसार प्रति किलो २० रुपये असा बाजारभाव मिळत आहे.  गेल्या मार्च महिन्यात टमाटा मालाची आवक वाढली होती त्यातच ज्या त्या बाजारपेठेत स्थानिक टमाटा माल दाखल होत असल्याने टमाटा २ रुपये प्रति किलो दराने विक्री होत होता. याशिवाय नाशिकच्या बाजार समितीतून पाकिस्तान, बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात टमाटा मालाची निर्यातही केली जायची मात्र भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे बॉर्डर बंद असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बॉर्डर बंद होती त्यामुळे परदेशातील निर्यात पूर्णपणे थांबली होती.  गेल्या पंधरवड्यापासून टमाटा मालाची आवक कमी होत चालल्याने बाजारभावात बºयापैकी सुधारणा झाली आहे. टमाटा मालाला (२०) किलो जाळीसाठी ४०० ते ४५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. टमाटा मालाला बाजारभाव नसल्याने अनेक शेतकºयांनी टमाटा पिकाकडे दुर्लक्ष केल्याने पीक नाश पावले होते, तर ज्यांनी टमाटा पिकाचे उत्पादन सुरू ठेवले होते त्यांना आजमितीस चांगला बाजारभाव मिळत आहे. बाजार समितीत आवक कमी झाल्याने तसेच मागणी असल्याने टमाटा मुंबई, गुजरात यांसह अन्य भागांत रवाना केला जात आहे. नाशिक बाजार समितीत टमाटा २० रुपये किलो, तर पुणे नारायणगाव या भागांत टमाटा मालाची आवक जास्त असल्याने टमाट्याला १३ ते १५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत आहे.टमाट्याला बॉर्डर बंदचनाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून पाकिस्तान तसेच बांग्लादेशात टमाटा मालाची आवक केली जाते. मात्र भारत- पाक सीमेवर अधूनमधून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे गेल्या वर्षी १५ आॅगस्टपासून बॉर्डर बंदच असल्याने नाशिकमधून जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे. आगामी कालावधीत बॉर्डर सुरू झाली तर टमाट्याचे बाजारभाव आणखी तेजित येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड