शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:39 IST

नाशिक : कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याची वस्तुस्थिती असली तरी कोरोनाशी लढताना दुसरीकडे अर्थचक्रदेखील सुरू राहिले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याने लॉकडाऊन होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, नागरिकांनी भीती न बाळगता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवताना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले.

नाशिक : कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसल्याची वस्तुस्थिती असली तरी कोरोनाशी लढताना दुसरीकडे अर्थचक्रदेखील सुरू राहिले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याने लॉकडाऊन होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, नागरिकांनी भीती न बाळगता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवताना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले.जिल्हा आणि शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत कोराना विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोनाशी लढताना नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्नदेखील सुटला पाहिजे यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामध्ये आता बदल होणार नाही. अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे हा प्रमुख उद्देश असून दैनंदिन व्यवहारातून रोजगार आणि त्यातून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा ही यामागची भूमिका आहे. त्यामुळे अर्थचक्र थांबता कामा नये, करोनाशी लढता लढता अर्थचक्राला चालना देण्याची भूमिका असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक आरती सिंग उपस्थित होते.

-------------जिल्हा रुग्णालयात लॅबसाठी प्रयत्नरुग्णवाढीची संख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालयातदेखील कोविड टेस्टिंग लॅब तयार करण्याचा विचार शासनाकडून सुरू झाला आहे. मविप्र वैद्यकीय महाविद्यालय येथे एक लॅब असली तरी शासनाच्या प्रयोगशाळेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.-----------------सरकारी रुग्णालयात खाटा राखीव ठेवणाररुग्णवाढीचा वेग लक्षात घेता आगामी नियोजनावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार एचएएल तसेच आयएसपी रुग्णालयांच्या खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.------------अर्थचक्र सुरू ठेवावेच लागेल, बाजारातील अर्थचक्र फिरले तरच व्यवहाराला चालना मिळेल. मालेगावातील पॉवरल्यूम सुरू झाल्याने तेथील अर्थचक्र ग्ाितमान झाले आहे.लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या नागरिकांनीच लॉकडाऊन नियमांचे पालन केले तर कोरोनाची लढाई लढता येईल.कोरोनाची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. कुणावरही फिरण्याचे बंधन नाही. मात्र बाजारात, पर्यटनाला जाताना मात्र सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा.कोरोना आहे, लॉकडाऊन नाही हे नागरिकांनी समजून स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.केवळ घरात राहून इम्युनिटी कशी वाढेल? चालले, फिरलेही पाहिजेच.नुसते गहू, तांदूळ देऊन चालणार नाही. मीठ, मिरची, तेल या अन्य वस्तूंसाठी पैसे लागतात, त्यासाठी बाजारात उलाढाल होऊ द्यावी लागेल.रुग्णसंख्या वाढली की लॉकडाऊन आणि कमी झाली की शिथिलता असे चालणार नाही. नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल.

 

टॅग्स :Nashikनाशिक