शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

राज्यात कृषीविषयक विधेयक लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 17:41 IST

सिन्नर : केंद्र सरकारच्या शेतकरी हिताचे कृषिविषयक विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन स्थगिती आदेश आघाडी सरकारने रद्द करुन राज्यात कृषी विधेयक लागू करावे अशा मागणीचे निवेदन भाजपाच्यावतीने तहसीलदार राहूल कोताडे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देभाजपाचे तहसिलदारांना निवेदन: आंदोलनाचा इशारा

सिन्नर : केंद्र सरकारच्या शेतकरी हिताचे कृषिविषयक विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन स्थगिती आदेश आघाडी सरकारने रद्द करुन राज्यात कृषी विधेयक लागू करावे अशा मागणीचे निवेदन भाजपाच्यावतीने तहसीलदार राहूल कोताडे यांना देण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संसदेत दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करुन शेतकर्‍यांच्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडवणारे पाऊल उचलले आहे. मात्र शेतकर्‍यांबद्दल कॉंग्रेस आणि विरोधक अकारण कांगावा व अप्रचार करुन राजकारण करीत आहेत. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकर्‍यांसाठी एक देश, एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदींनी एसएमपी (किमान आधारभूत किंमत) कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचा व दिलेले स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश काढला असून हा स्थगिती आदेश रद्द करुन महाराष्ट्रात कृषी विधेयक लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसिलदारांच्यावतीने नायब तहसिलदारांनी निवेदन स्विकारले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, शहराध्यक्ष सोनल लहामगे, भाऊसाहेब शिंदे, सुनील माळी, दत्तात्रेय गोसावी, राजेश कपूर, डॉ. दिपककुमार श्रीमाली, सुभाष कर्पे, ज्ञानेश्‍वर कुर्‍हाडे, विशाल क्षत्रिय, सचिन गोळेसर, रविंद्र नाठे, चंद्रकला सोनवणे, सरला त्रिवेदी, अतुल गुजराथी, गोरख गोळेसर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण