शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:59 IST

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. यामुळे बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरत आहे.

ठळक मुद्देवडनेर : दमट वातावरणाने शेतकऱ्यांत वाढली चिंता

वडनेर : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. यामुळे बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरत आहे.यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा व कांदा लागवडीत कमालीची वाढ झाली आहे. पाणी टिकून राहील या आशेने मोठ्या प्रमाणावर पिकांची पेरणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. परंतु सध्या बदललेले हवामान अधून मधून ढगाळ व दमट वातावरण यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वाढत आहे.पावसाचे प्रमाण यंदा प्रथमच चांगले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत. यामुळे रब्बी हंगामातील पिकांमध्ये कमालीची वाढ झाली. गहू, हरभरा पेरणी तालुक्यात वाढलेली आहे. तसेच कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. खराब वातावरणामुळे कांद्याची रोपे खराब झाली होती, यामुळे शेतकºयांनी इकडून तिकडून रोपे विकत घेऊन कांदा लागवड केली आहे. यंदा सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात थंडी कमी अधिक प्रमाणात दिसून आली. रब्बी हंगामातील पिकांच्या पोषकतेसाठी महत्त्वाची मानली जाणारी थंडी प्रमाण कमी अधिक होत असल्याने पिकांच्या वाढीसाठी अडथळा तर बसणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कांदा, हरभरा या पिकांच्या समाधानकारक वाढीस थंडी पोषक असते. थंडीच्या मोसमात गहू, हरभरा पिकांची शेवटच्या टप्प्यात दमदारपणे वाढ होऊन फुलोºयात दाणे भरले जातात. बरोबरच लागवड झालेल्या कांद्याचे मिळालेल्या थंडीतून अधिक जोमाने वाढ उत्तम पद्धतीने कांदा पोसला जातो. मात्र गेल्या काही दिवसात परिसरातून गायब झालेली थंडी, वातावरणातील बदल हा शेतकºयांच्या उरात धडकी भरविणारा आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा