शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:59 IST

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. यामुळे बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरत आहे.

ठळक मुद्देवडनेर : दमट वातावरणाने शेतकऱ्यांत वाढली चिंता

वडनेर : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. यामुळे बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरत आहे.यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा व कांदा लागवडीत कमालीची वाढ झाली आहे. पाणी टिकून राहील या आशेने मोठ्या प्रमाणावर पिकांची पेरणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. परंतु सध्या बदललेले हवामान अधून मधून ढगाळ व दमट वातावरण यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वाढत आहे.पावसाचे प्रमाण यंदा प्रथमच चांगले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत. यामुळे रब्बी हंगामातील पिकांमध्ये कमालीची वाढ झाली. गहू, हरभरा पेरणी तालुक्यात वाढलेली आहे. तसेच कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. खराब वातावरणामुळे कांद्याची रोपे खराब झाली होती, यामुळे शेतकºयांनी इकडून तिकडून रोपे विकत घेऊन कांदा लागवड केली आहे. यंदा सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात थंडी कमी अधिक प्रमाणात दिसून आली. रब्बी हंगामातील पिकांच्या पोषकतेसाठी महत्त्वाची मानली जाणारी थंडी प्रमाण कमी अधिक होत असल्याने पिकांच्या वाढीसाठी अडथळा तर बसणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कांदा, हरभरा या पिकांच्या समाधानकारक वाढीस थंडी पोषक असते. थंडीच्या मोसमात गहू, हरभरा पिकांची शेवटच्या टप्प्यात दमदारपणे वाढ होऊन फुलोºयात दाणे भरले जातात. बरोबरच लागवड झालेल्या कांद्याचे मिळालेल्या थंडीतून अधिक जोमाने वाढ उत्तम पद्धतीने कांदा पोसला जातो. मात्र गेल्या काही दिवसात परिसरातून गायब झालेली थंडी, वातावरणातील बदल हा शेतकºयांच्या उरात धडकी भरविणारा आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा