शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

कामगार कपातीची कुऱ्हाड कोसळलेल्या ७०८ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना तूर्तास दिलासा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्यावर कोरोना काळात भरती केलेल्या ७०८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कामावरून कमी करण्यात ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्यावर कोरोना काळात भरती केलेल्या ७०८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कामावरून कमी करण्यात आले होते. मात्र, एकीकडे तिसऱ्या लाटेची भीती, तसेच कर्मचारी भरतीचे नियोजन केले जात असताना गतवर्षी ऑगस्टमध्ये भरती करण्यात आल्यानंतर जिवावर उदार होऊन काम केलेल्या ७०८ कंत्राटी कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याने शासन, प्रशासनाच्या धोरणाबाबत रोष प्रकट होऊ लागला. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून काही काळ तरी या कंत्राटी कामगारांना दिलासा दिला आहे.

आरोग्य विभागांच्या कोविड सेंटरमध्ये, रुग्णालयांमध्ये कोरोना काळात या कंत्राटी कामगारांनी जीव धोक्यात घालून कार्य केले. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात केलेल्या भरतीनंतर दर तीन महिन्यांनी एकेका दिवसाचा ब्रेक देत पुन्हा कामावर रुजू करून घेतले होते. मात्र, यावेळी कोरोना योद्ध्यांना कायमचा ब्रेक देण्यात आलेला असल्याने त्यांच्या नोकरीवर अचानकच गंडांतर आले. कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे कंत्राटी कर्मचारी त्यामुळे बेरोजगार झाले होते. कोरोना महामारीत काम करणाऱ्या कोणालाही कामावरून कमी करणे हा त्यांच्यावर अन्यायच असल्याची या कोरोना योद्ध्यांची भूमिका होती. जेव्हा कुटुंबीयदेखील कोरोना रुग्णांच्या जवळपास जायला घाबरत होते, त्यावेळी या सर्व कोरोना योद्ध्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेचा विचार करून अशा प्रकारची कृती तडकाफडकी करणे अयोग्य असल्याचे बहुतांश कोरोना योद्ध्यांचे म्हणणे होते.

इन्फो

पुन्हा तिसरी लाट आली तर...

जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने बाधित तीस रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा तिसरी लाट आलीच आणि डेल्टामुळे दुसऱ्या लाटेपेक्षाही अधिक वेगाने प्रसार होऊ लागल्यास प्रशासनासमोर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी अननुभवी असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यापेक्षा या कर्मचाऱ्यांनाच अजून काही काळ तरी मुदतवाढ देणे नितांत गरजेचे होते. त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

इन्फो

४० टक्के कर्मचारी कमी असल्याने मुभा

या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर भुजबळ यांनी प्रशासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतची आकडेवारी जाणून घेत आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यात आधीच ४० टक्के आरोग्य कर्मचारी कमी असून, तिसऱ्या लाटेची शक्यता असताना या कर्मचाऱ्यांची कपात करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगितले. तसेच टोपे यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कर्मचारी कपातीबाबतच्या निर्णयातून नाशिकला वगळण्यास सांगितल्यानंतर तसे आदेश जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

-----------------------