शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

वडाळागाव परिसरात अवैध प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखली जात, सुमारे १२ हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जिनतनगर, पिंगुळी बाग, यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव करतात. त्यांना कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी बससेवेअभावी रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यासाठी नागरिकांना मांगीरबाबा चौक येथून रिक्षात बसावे लागते. सदर रिक्षा हनुमान मंदिर खंडोबा चौक यामार्गे गल्लीबोळातून मार्गक्र मण बेफान वेगाने आणि अवैध प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. सदर रिक्षाचालकांना भान नसते की, आपण गल्ली बोळातून वाहन चालवत आहे. त्यामुळे लहान मुलांची अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने गल्लीबोळातून रिक्षा वाहतूक बंद करून मुख्य रस्त्यांनी आणि वेगमर्यादेचे भान ठेवून रिक्षाचालकांना वाहतूक करण्याची शिस्त लावावी तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.वडाळागावात अद्यापही शहर वाहतूक बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नाईलाजाने गावातील नागरिकांना रिक्षांनी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सिटांवर सहा ते सात आणि रिक्षाचालकाशेजारी तीन ते चार प्रवासी बसलेले असतात रिक्षाचालकांकडे वाहन परवाना आणि गणवेश नसल्याचे नागरिकांची तक्र ार आहे. तसेच शंभरफुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात दुतर्फा रस्त्यावर रिक्षा उभा करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीNashikनाशिक