शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

वडाळागाव परिसरात अवैध प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखली जात, सुमारे १२ हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जिनतनगर, पिंगुळी बाग, यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव करतात. त्यांना कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी बससेवेअभावी रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यासाठी नागरिकांना मांगीरबाबा चौक येथून रिक्षात बसावे लागते. सदर रिक्षा हनुमान मंदिर खंडोबा चौक यामार्गे गल्लीबोळातून मार्गक्र मण बेफान वेगाने आणि अवैध प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. सदर रिक्षाचालकांना भान नसते की, आपण गल्ली बोळातून वाहन चालवत आहे. त्यामुळे लहान मुलांची अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने गल्लीबोळातून रिक्षा वाहतूक बंद करून मुख्य रस्त्यांनी आणि वेगमर्यादेचे भान ठेवून रिक्षाचालकांना वाहतूक करण्याची शिस्त लावावी तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.वडाळागावात अद्यापही शहर वाहतूक बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नाईलाजाने गावातील नागरिकांना रिक्षांनी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सिटांवर सहा ते सात आणि रिक्षाचालकाशेजारी तीन ते चार प्रवासी बसलेले असतात रिक्षाचालकांकडे वाहन परवाना आणि गणवेश नसल्याचे नागरिकांची तक्र ार आहे. तसेच शंभरफुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात दुतर्फा रस्त्यावर रिक्षा उभा करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीNashikनाशिक