शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

वाहन तपासणीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 18:50 IST

कळवण : वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सिर्टिफकेट-पीयूसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकळवण : साडेचार लाख वाहनांसाठी केवळ तीन पीयूसी सेंटर

मनोज देवरेकळवण : वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सिर्टिफकेट-पीयूसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून ही चाचणी करण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र मालेगाव विभागात फक्त तीनच पीयूसी सेंटर असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.शहरासह ग्रामीण भागात वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. वाहनांमुळे प्रदूषण हि मोठ्या प्रमाणात होत असून धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. वाहनाने दहा हजार किलोमीटरची मर्यादा ओलांडल्यानंतर पीयूसी करणे बंधनकारक असले तरी त्याकडे वाहनचालक कानाडोळा करत असल्याचे चित्र असून उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.हि वाहने धावतायेत रस्त्यावरवाहनांचा प्रकार वाहनांची संख्यादुचाकी ३३४५८०कार आण िजीप ३०१५८आॅटोरिक्षा ३९८७ट्रक ५५८८ट्रॅक्टर ३०६३७ट्रेलर्स २०१८१स्कुल बस २७६टँकर्स २१२टेम्पो,जेसीबी,अँब्युलन्स १५०१८बस ६६टॅक्सी १४९७एकूण ४,४७,६००प्रदूषित वाहने तपासणीचे दर-मोटार वाहन अधिनियम १८९९ मधील तरतुदीनुसार मोटार वाहनांची वायू तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू तपासणी केंद्रांना देण्यात आले आहे.याप्रमाणे दुचाकीसाठी ३५ रु पये, तीनचाकी ७० चारचाकी ९०, डिझेलवरील वाहने ११० रु पये आकारणे आवश्यक आहे.वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तीन ठिकाणी पीयूसी सेंटर असून तीन सेंटर प्रस्तावित आहेत.ड्रायिव्हंग स्कुल किंवा संस्था, व्यक्ती यांना पीयूसी सेंटर सुरु करायचे असल्यास त्यांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क करावा.- किरण बिडकर, उपप्रादेशिक अधिकारी, परिवहन विभाग, मालेगाव.वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या होत असून नागरिकांच्या आरोग्यासोबतच परिवारणालाही त्याची हानी पोहचत आहे. वाहनधारकांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून वाहनांची नियमित तपासणी करून घ्यावी. उपप्रादेशिक विभागाने याबाबतीत लक्ष घालावे.-डॉ. किशोर कुवर, अध्यक्ष महाराष्ट्र पर्यावरण विकास संस्था.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक