शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 21, 2014 01:02 IST

स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

मालेगाव : कायम केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मनपा प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे. गलिच्छ शहर अशीच शहराची ओळख कायम असून, शहर वर्षभर विविध साथींच्या आजारांनी त्रस्त राहत आहे. हद्दवाढ भागासह शहरातील लोकसंख्या एकीकडे वाढत असताना त्यातुलनेत येथील महानगरपालिका सफाई कामगारांची संख्या वाढलेली नाही. दुसरीकडे साफसफाईचा देण्यात आलेला खासगी ठेका हा भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेला आहे. शहरातील काही ठराविक भाग वगळता बहुतांश भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी अजूनही म्हणावी तशी जागरूकता नाही.एक हजार लोकसंख्येमागे एक झाडूकामगार, एक गटार कामगार व एक सफाई कामगार असे तीन कामगार असावयास हवेत. त्या हिशेबाने साधारण सात लाख लोकसंख्येच्या मालेगाव महानगरपालिकेत कायम २१०० व अतिरिक्त तीनशे असे २४०० कामगार असावयास पाहिजे. मात्र आजमितीस मनपात त्यापेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे जवळपास अकराशेच कामगार आहेत. विशेष म्हणजे त्यातही खुद्द मनपा प्रशासनाच्या कामगारांची संख्या ही अवघी साडेसहाशे असून, उर्वरित साडेचारशे कामगार हे खासगी ठेकेदाराकडील आहेत. यातही जे पदवीधर, पदव्युत्तर आहेत; परंतु मनपात भरती होताना कामगार म्हणून रुजू झाले आहेत ते मात्र प्रत्यक्षात आपल्या शिक्षणाचा सदुपयोग म्हणून मनपाच्या विविध खात्यांमध्ये कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम पाहत आहेत. किरकोळ रजा, आजारपण, लग्नादी कार्यासाठी रजेवर असणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्यक्षात शहर साफसफाईसाठी रोज मनपाचे पाचशे कामगार देखील उपलब्ध असतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्याउपर शहरसाफसफाई कशी, कितीवेळ, कोणत्या पद्धतीने होते हादेखील स्वतंत्र विषय आहे. ज्या गाड्या कार्यरत आहेत त्या विशिष्ट भागात विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या वॉर्डातच अधूनमधून कार्यरत दिसून येतात. मालेगाव शहरातून घंटागाड्यांमधून रोज १९० ते २०० टन किंवा त्याहून अधिक कचरा उचलला जात असल्याचा मनपा स्वच्छता विभागाचा दावा आहे. मात्र या दाव्याविषयीदेखील येथे वाद असून, कमी कचऱ्याचे ट्रॅक्टर्स जास्त वजनाचे दाखवून मनपाचा पैसा लाटला जास्त असल्याचा आरोप मनपातील विरोधी जनता दल गटनेत्यांकडून यापूर्वी पुराव्यानिशी करण्यात आलेला आहे. देशभरात सध्या स्वच्छ भारत मोहीम जोरात सुरू आहे. मात्र दरवेळेस केंद्र व राज्य शासनाकडे आर्थिक अनुदानाच्या अपेक्षेने डोळे लावून पाहणाऱ्या येथील स्थानिक मनपा प्रशासन व प्रमुख सत्ताधारी आणि विरोधी पक्षातर्फे तशी कुठलीही मोहीम येथे अद्याप राबविण्यात आलेली नाही. शहर - तालुक्यात देखील विविध शाळा - महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया, अतिसारचे रुग्ण प्रमाणापेक्षा अधिक आढळून आल्यानंतरदेखील शहर स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष अशी मोहीम राबविली गेलेली नाही.याउलट शहरातील मोसम नदीकाठ, नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, विविध प्रमुख सरकारी कार्यालये, विविध छोटी-मोठी हॉटेल्स परिसरातील नेहमीचा घाणकचरा हा कायमच आहे.