शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:16 IST

आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आदिवासी बांधवांनी वनजमिनीबाबत दावे दाखल करावे, याबाबत जिल्हास्तरीय वनहक्क बैठकीत पाठपुरावा करू, अशी ग्वाही जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य नितीन पवार यांनी दिली.

कळवण : आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आदिवासी बांधवांनी वनजमिनीबाबत दावे दाखल करावे, याबाबत जिल्हास्तरीय वनहक्क बैठकीत पाठपुरावा करू, अशी ग्वाही जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य नितीन पवार यांनी दिली.  जयदर परिसरातील पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य, वीज, वनहक्क जमीन आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने व संबंधित यंत्रणेने पावले उचलावीत, असे आवाहनही पवार यांनी जयदर येथील आढावा बैठकीत केले. जयदर व परिसरातील गावांमधील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेण्याबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, पोलीसपाटील व ग्रामस्थांच्या वतीने संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वनहक्क जमिनींबरोबर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, विजेच्या समस्या, शिधापत्रिका, आरोग्य, पाणीपुरवठा योजनांच्या अपूर्ण कामांबाबत आदिवासींच्या वतीने तक्रारी मांडण्यात आल्या. तालुक्यात ठप्प झालेल्या विकासकामांबाबत आदिवासी बांधवांनी नाराजीचा सूर काढला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार होत्या. पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, केदा ठाकरे, ज्येष्ठ नेते अर्जुन बागुल, संतोष देशमुख, बाबूराव पवार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांच्यासह विविध खात्यांंचे प्रमुख उपस्थित होते. कनाशी व जयदर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांची दुरुस्ती करावी, जयदर परिसरातील वनहक्क कायद्यानुसार वनजमिनींचे प्रस्ताव मंजूर करावे. प्रमाणपत्र मिळवून जमीन नाही, जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले, वनजमिनीचे प्रस्ताव फेटाळून लावले आदी तक्रारी आदिवासी बांधवांकडून यावेळी मांडण्यात आल्या. जांभाळ, भौती, हनुमंतमाळ पाडा, शिरसा, पायरपाडा, महाल, वाड्याआंबा पाडा, गायदरपाडा, धुमंदर, कोसवन, बंधारपाडा, नाळीद, पुणेगाव, खडकीपाडा, जयदर, मोहबारी, पिंपळे, भांडणे, पाडगण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पाणीपुरवठा योजनांतर्गत अपूर्णावस्थेत असलेली कामे, विहिरींची कामे आदी कामासंदर्भात चर्चा करण्यात येऊन अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी करून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. यावेळी पंचायत समतिीचे माजी सदस्य अर्जून बागूल, पंचायत समतिीचे सदस्य लाला जाधव, केदा ठाकरे, केदा बहिरम, संतोष गावित, उत्तम भोये, नंदू गावित, रामदास चव्हाण, राजाराम चौधरी, मन्साराम गायकवाड, दत्तू गांगुर्डे, पोपट पवार, लक्ष्मण पवार, गुड्डू वराडे आदीसह सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे सभापती, सदस्य यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.

टॅग्स :Nashikनाशिक