शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:16 IST

आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आदिवासी बांधवांनी वनजमिनीबाबत दावे दाखल करावे, याबाबत जिल्हास्तरीय वनहक्क बैठकीत पाठपुरावा करू, अशी ग्वाही जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य नितीन पवार यांनी दिली.

कळवण : आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आदिवासी बांधवांनी वनजमिनीबाबत दावे दाखल करावे, याबाबत जिल्हास्तरीय वनहक्क बैठकीत पाठपुरावा करू, अशी ग्वाही जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य नितीन पवार यांनी दिली.  जयदर परिसरातील पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य, वीज, वनहक्क जमीन आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने व संबंधित यंत्रणेने पावले उचलावीत, असे आवाहनही पवार यांनी जयदर येथील आढावा बैठकीत केले. जयदर व परिसरातील गावांमधील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेण्याबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, पोलीसपाटील व ग्रामस्थांच्या वतीने संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वनहक्क जमिनींबरोबर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, विजेच्या समस्या, शिधापत्रिका, आरोग्य, पाणीपुरवठा योजनांच्या अपूर्ण कामांबाबत आदिवासींच्या वतीने तक्रारी मांडण्यात आल्या. तालुक्यात ठप्प झालेल्या विकासकामांबाबत आदिवासी बांधवांनी नाराजीचा सूर काढला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार होत्या. पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, केदा ठाकरे, ज्येष्ठ नेते अर्जुन बागुल, संतोष देशमुख, बाबूराव पवार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांच्यासह विविध खात्यांंचे प्रमुख उपस्थित होते. कनाशी व जयदर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांची दुरुस्ती करावी, जयदर परिसरातील वनहक्क कायद्यानुसार वनजमिनींचे प्रस्ताव मंजूर करावे. प्रमाणपत्र मिळवून जमीन नाही, जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले, वनजमिनीचे प्रस्ताव फेटाळून लावले आदी तक्रारी आदिवासी बांधवांकडून यावेळी मांडण्यात आल्या. जांभाळ, भौती, हनुमंतमाळ पाडा, शिरसा, पायरपाडा, महाल, वाड्याआंबा पाडा, गायदरपाडा, धुमंदर, कोसवन, बंधारपाडा, नाळीद, पुणेगाव, खडकीपाडा, जयदर, मोहबारी, पिंपळे, भांडणे, पाडगण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पाणीपुरवठा योजनांतर्गत अपूर्णावस्थेत असलेली कामे, विहिरींची कामे आदी कामासंदर्भात चर्चा करण्यात येऊन अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी करून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. यावेळी पंचायत समतिीचे माजी सदस्य अर्जून बागूल, पंचायत समतिीचे सदस्य लाला जाधव, केदा ठाकरे, केदा बहिरम, संतोष गावित, उत्तम भोये, नंदू गावित, रामदास चव्हाण, राजाराम चौधरी, मन्साराम गायकवाड, दत्तू गांगुर्डे, पोपट पवार, लक्ष्मण पवार, गुड्डू वराडे आदीसह सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे सभापती, सदस्य यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.

टॅग्स :Nashikनाशिक