शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

घालाल हुज्जत, तर पोलिसांची बरकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:29 IST

शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड... त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना ‘बरकत’ प्राप्त करून देणे, असा प्रकार शहरात घडू लागला आहे.

नाशिक : शहराच्या कोणत्याही भागात वाहने लावताना तुम्ही ती शिस्तीत नियमांचे पालन केले असले तरी पोलिसांच्या मनात येईल तोच गुन्हा दाखल होईल. वाद घातला, पोलिसांना प्रत्युत्तर दिले की, आणखी कलमे आणि आणखी दंड... त्यामुळे वस्तुस्थिती सांगणे म्हणजे पोलिसांना ‘बरकत’ प्राप्त करून देणे, असा प्रकार शहरात घडू लागला आहे.नियमभंग केला आणि त्यामुळेच पोलिसांनी अडवून कारवाई केली तर साधारणत: त्याला कोणी हरकत घेत नाही. मुळातच पोलिसांनी अडवले की, आता खैर नाही अशी सामान्यत: मानसिकता असते. त्यामुळे सहसा कोणी प्रतिप्रश्न करीत नाही. मात्र नियमांचा भंग केला नसेल किंवा नियमभंग करणारे अनेक आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला एक जण तर अशा व्यक्तींनी आपली बाजू मांडून उपयोग नसतो. बºयाचदा रहदारीला अडथळा होईल अशा रितीने मोटार उभी नसेल, परंतु केवळ त्यावर दंड भरायचे म्हटल्यास नागरिक विरोध करतात. आपण नियमभंग केलेला नाही.  रहदारीला कोणताही अडथळा झालेला नाही असे बिंबवून उपयोग नाही. अशावेळी सरळ वाद घालणाºया नागरिकाने मात्र गंभीर गुन्हा केला असल्यागत पोलीस कर्मचाºयांची भाषा सुरू होते आणि प्रसंगी जास्त बोलले किंवा पोलिसांशी हुज्जत घातली तर वाहतूक नियमभंगाची कलमे वाढत जातात. मग, कागद नव्हते, इन्शुरन्स नाही, असे अनेक नियम तपासून सर्व कलमांचे चलनही फाडले जाते.  बºयाचदा अनेक नागरिक दंड भरण्यापेक्षा कोर्टात जाण्याची तयारी दर्शवितात, परंतु अशावेळी येथेच पावती फाडण्याचा आग्रह नाही, तर कोर्टात जायचे असेल तर लायसन जप्त, असा प्रकार केला जातो. या प्रकारामुळे पोलिसांशी वाद घालणे महागात पडत असल्याने गुमान दंड भरणे हेच शहाणपणाचे ठरते असे अनुभवही काहींनी कथन केले. नियमभंगाचे कोणीच समर्थन करीत नाही, मात्र एखाद्याकडून कागदपत्रे अनवधानाने राहिली असावीत किंवा नाही हे ओळखण्याची नजर निश्चितच पोलिसांकडे असते. त्याचा वापर न करता सर्वांनाच कारवाईत भरडणे कितपत योग्य, असाही प्रश्न केला जात आहे. ...तर सरकारी कामात अडथळा४पोलिसांशी वाद घातला तर सहज होणारा दंडही वाढत जातो. परंतु एखादा नागरिक जास्तच आक्रमक झाल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हाही दाखल होतो. दोनेक वर्षांपूर्वी शरणपूररोडवर एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराशी रोजच ठेवलेल्या बॅरिकेड्समुळे अडचण होत असल्याने वाद घालणाºया स्थानिक रहिवासी व्यक्तीला सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. म्हणजेच वाहतूक नियमाचा भंग म्हणूनच कारवाई होते, असे काही नाही.वाहतूक पोलिसांच्या वारंवार होणाºया कारवाईला कंटाळून अनेकदा रिक्षाचालकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे प्रकार शहरात घडले आहेत. मध्यंतरी तर एका मोटारचालकाने रस्त्यातच बैठक घातली. यासंदर्भातही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस