शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

राज्यभरातून ठराव आले तर शेतकरी कायदे रद्द करणार- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 08:56 IST

शेतकरी जनजागृती परिषदेत आश्वासन

नाशिक : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर काय काय बदल होत आहेत,  याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून, कोणतीची चर्चा न करता शेतीविषयक कायदे मंजूर करण्यात आले आहेत. कामगार कायद्यांमध्येही बदल करून भांडवलदारधार्जीणे कायदे केले जात आहेत. देशात प्रत्येक गोष्ट भांडवलदारांसाठी केली जात असल्याचा आरोप करीत  राज्यभरातून शेतकरी कायद्यांच्या विरोधात ठराव आल्यास महाराष्ट्रात ते कायदे रद्द करण्यात येतील, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीतर्फे केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व प्रीपेड वीजबिल विधेयकाला विरोध आणि दिल्लीसह देशभरात लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी अशोक खालकर होते. किसान सभेचे किसन गुर्जर, राजू देसले आदी उपस्थित होते. 

आपल्या शेतकऱ्यांना ‘ते’ समजलेले नाही

थोरात म्हणाले, पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या कायद्यामुळे होणारे नुकसान समजले आहे. यामुळे मागील आठ महिन्यांपासून ते याविरोधात आंदोलन करत आहेत. आपल्या शेतकऱ्यांना अजून ते समजलेले नाही आणि चिमटा बसल्याशिवाय ते समजणारही नाही, असे ते म्हणाले. परिषदेत करण्यात आलेल्या विविध ठरावांचे वाचन राजू देसले यांनी केले. उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. 

रॅलीला परवानगी नाकारली

परिषदेच्या निमित्ताने ट्रॅक्टर रॅलीचे  आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यास परवानगी नाकारण्यात आल्याने सिन्नर फाटा येथील बाजार समितीच्या उपबाजार आवार परिसरातच प्रतीकात्मक रॅली काढण्यात आली. यात परिसरातील  शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात